Friday, 27 May 2022

 World's largest lift installed in Jio office .BKC Mumbai, Capacity 200 person


बडबड करा

 *तुम्ही जसजसे मोठे व्हाल तसतसे अधिक बोला*


   असे डॉक्टर सांगतात. * सेवानिवृत्तांनी (ज्येष्ठ नागरिकांनी) अधिक बोलले पाहिजे कारण सध्या स्मरणशक्ती कमी होण्यापासून रोखण्याचा कोणताही मार्ग नाही. अधिक बोलणे हा एकमेव मार्ग आहे. *

  ज्येष्ठ नागरिकांशी अधिक बोलण्याचे किमान तीन फायदे आहेत.

    *प्रथम:* बोलण्याने मेंदू सक्रिय होतो आणि मेंदू सक्रिय राहतो, कारण भाषा आणि विचार एकमेकांशी संवाद साधतात, विशेषत: पटकन बोलत असताना, ज्यामुळे नैसर्गिकरित्या विचारांचे प्रतिबिंब जलद होते आणि स्मरणशक्ती देखील वाढते. जे ज्येष्ठ नागरिक बोलत नाहीत, त्यांची स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते.


    *दुसरे:* बोलल्याने बराच ताण दूर होतो, मानसिक आजार टाळतो आणि तणाव कमी होतो. आपण अनेकदा काहीही बोलत नाही, पण आपण ते आपल्या हृदयात दडवून घेतो आणि आपला गुदमरतो._हे खरे आहे! तर! वरिष्ठांना अधिक बोलण्याची संधी दिल्यास आनंद होईल.


    * तिसरा: * बोलण्यामुळे चेहऱ्याच्या सक्रिय स्नायूंचा व्यायाम होतो आणि त्याच वेळी घशाचा व्यायाम होतो आणि फुफ्फुसाची क्षमता देखील वाढते, त्याच वेळी डोळे आणि कान खराब होण्याचा धोका कमी होतो आणि चक्कर येण्यासारखे सुप्त धोके कमी होतात. . आणि बहिरेपणा.


   *थोडक्यात, सेवानिवृत्त, म्हणजेच ज्येष्ठ नागरिक* अल्झायमरपासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शक्य तितके बोलणे आणि लोकांशी सक्रियपणे संवाद साधणे. त्यावर दुसरा उपचार नाही. *

   *म्हणून, आपण अधिक बोलूया आणि इतर ज्येष्ठांना नातेवाईक आणि मित्रांसोबत अधिक बोलण्यास प्रोत्साहित करूया...👍* सौजन्य FB

बडबड

 

Name: Shriyan Naik

Age: 7

मधाची गोष्ट


 सह्याद्रीतील आदिवासींच्या मधाची गोष्ट!


(भवतालाच्या गोष्टी १८)

आग्या मोहोळ हे उंच कड्याला लागते. ते काढायला किमान आठ-नऊ लोकांचा गट असतो. त्यात सर्वजण रक्ताच्या नात्याचे असतात. कमरेला दोर बांधून खाली टांगता राहणारा व तो दोर गच्च पकडून ठेवणारा या दोघातील नाते बर्‍याचदा मेव्हण्याचे असते. त्यात जबाबदारीची जाणीव अधिक प्रबळ होत असावी... पोळे सील झाले म्हणजे मध साठवलेले पोळे माश्यांनी पांढर्‍या स्रावाने बंद केले की तो मध पक्व झाल्याचा संकेत असतो...

आदिवासींच्या मध गोळा करण्यामध्ये अशा अनेक प्रथा, रिती, ज्ञान, किस्से आहेत. त्यांची माहिती घेणे म्हणजे त्यांचे भावविश्व समजून घेणे. गेल्याच आठवड्यात ‘आंतरराष्ट्रीय मधमाशी दिन’ होता. त्यानिमित्त सह्याद्रीतील आदिवासींची मध गोळा करण्याची ही गोष्ट.

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://www.bhavatal.com/Tribal-Honey-Story

भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील ही अठरावी गोष्ट.

भवतालविषयक दर्जेदार माहितीसाठी उत्तम पर्याय - bhavatal.com

(इतरांसोबत शेअरही करा.)

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


 नाव दावोसला जाण्याचं, मात्र जनतेच्या पैशावर सैर करण्याचे हे उद्योग

 - आ. अतुल भातखळकर यांची मविआ मंत्र्यांच्या दौर्‍यावर कडाडून टीका

मुंबई, दि. 27 मे (प्रतिनिधी)

            मविआचे मंत्री दावोसला केवळ भारतीय कंपन्यांशी करार करण्याकरिता गेले होते का? अथवा दाओस दौर्‍यामध्ये अन्य किती कंपन्यांशी करार केला याची माहिती त्यांनी जनतेला द्यावी तसेच केवळ दोन भारतीय कंपन्यांशी करार केले असल्यास या दौर्‍याचा संपूर्ण खर्च हा या सर्व मंत्र्यांकडून वसूल करण्यात यावेत अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी आ. अतुल भातखळकर यांनी केली.


             महाविकास आघाडी सरकारचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, त्याचबरोबर ऊर्जा मंत्री नितीन राऊत व उद्योग मंत्री सुभाष देसाई हे सर्वजण दाओसला जाऊन भारतीय कंपन्यांबरोबर करार करून परत आले. यावेळी त्यांनी एक कंपनी गुरगावातील Renewable Energy ज्याच्याबरोबर हजारो कोटींचे करार केले तर दुसरी शैक्षणिक कंपनी, Byju ज्याच्याबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या शाळांकरिता MOU केला गेला. जर परदेशात जाऊन भारतीय कंपन्यांबरोबर MOU करायचे होते तर त्याच्याकरिता जनतेच्या पैशाचा चुराडा करून दावोसला जाण्याची आवश्यकता काय होती? असा सवाल आ. भातखळकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे. नाव दावोसला जाण्याचं, मात्र जनतेच्या पैशावर सैर करण्याचे हे उद्योग असल्याची टीका आ. भातखळकर यांनी केली. त्यामुळे दावोसला जाऊन अन्य किती कंपन्यांशी करार केले याची माहिती जनतेला द्यावी आणि या दोन कंपन्यांशी करार केले असतील तर दावोसच्या दौऱ्यावर जनतेच्या पैशातून जो खर्च झालेला आहे तो सर्व खर्च जनतेला परत देण्यात यावा आणि हे पैसे तिन्ही मंत्र्यांकडून वसूल करण्यात यावेत अशी मागणी आ. अतुल भातखळकर यांनी यावेळी केली.

 मा. अमित शहा यांनी बंद दरवाजाआड वचन दिलं होतं”, हे खोटं कोण बोलतंय

हे आज महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे उमगले आहे

 - आ. अतुल भातखळकर यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

            जे महाराष्ट्राच्या छत्रपतींशी खोटं बोलू शकतात, ते मा. अमित शहा यांच्याशीही बोलू शकतात. “त्यामुळे बंद दरवाजाआड वचन दिलं होतं” हे खोटं कोण बोलतंय हे आज महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे उमगले आहे अशी बोचरी टीका भाजपा मुंबई प्रभारी आ. अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

              जे महाराष्ट्राच्या छत्रपतींशी, ते सुद्धा त्यांच्या विषयाकरिता खोटं बोलू शकतात, असे मुख्यमंत्री मा. अमित शहा यांच्याशी तर सहजतेने खोटं बोलू शकतात हे आज पूर्णपणे सिद्ध झाले आहे अशी टीका आ. भातखळकर यांनी यावेळी केली. तसेच कुठल्याही मुख्यमंत्रीपदाचे वचन हे त्यांना दिले गेले नव्हते परंतु केवळ सत्तेच्या लालसेपायी स्वतः मुख्यमंत्री व्हायचे आणि स्वतःच्या मुलाला कॅबिनेट मंत्री करायचे म्हणून हिंदुत्व, मराठी बाणा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात करण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे, हेच आजच्या छत्रपती संभाजीराजेंच्या विधानांवरून सिद्ध झालेले आहे असे म्हणत आ. भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.



पेशवे

 *गंगाबाई…एक दुर्लक्षित पेशवीण*

संकलन - सुधीर लिमये पेण

पेशवाईतील प्रत्येक पेशवे पत्नीच्या नशिबी वैधव्य लिहिलेले दिसते. असे असुनही या प्रत्येक स्त्रीला पती निधना नंतर व्यवस्थित आयुष्य जगता आले. अपवाद रमाबाईंचा कारण त्या सती गेल्या. त्या काळची कुटुंब संस्था, पेशवे घराण्याचा दरारा आणि समाजात असलेला पेशव्या बद्दलचा आदर या सगळ्या मुळे या स्त्रियाचे आयुष्य सुसह्य झाले असावे.

एकूणच या सगळ्या स्त्रिया कर्तृत्ववान आणि वलयांकित. त्यातील राधाबाई, काशीबाई किँवा रमाबाई बद्दल अजुनही भरभरून लिहिले किँवा बोलले जाते. पण एक दुर्लक्षित राहिली.. ती म्हणजे गंगाबाई .

गंगाबाई म्हणजे नारायण राव पेशव्यांची पत्नी, आजही त्यांच्या बद्दल फारच कमी माहीती मिळते.

कृष्णजी हरी साठ्यांची ही कन्या २२ एप्रिल १७६३ पेशव्याची सुन होऊन शनिवार वाड्यात आली. नारायणराव आणि गंगाबाईचे लग्न सिंहगडावर झाले. अवघा १० वर्षाचा संसार आणि मग ३० ऑगस्ट १७७३ ला नारायणरावांची हत्या झाली. गंगाबाईच्या जन्माची तारीख माहिती नाही, पण मृत्युच्या वेळेस नारायणराव १८ वर्षाचे म्हणजे गंगा बाई १५-१६ वर्षाच्या असाव्यात. पती निधनाच्या दुःखाने त्यांनी प्रचंड आक्रोश केला, आपल्या थोरल्या जाऊबाई रमाबाई प्रमाणे त्यांना सती जायचे होते. पण पोटात पेशवे घराण्याचा वंश वाढत होता त्या मुळे त्यांना सती जाण्या पासुन रोखले गेले. त्याच रात्री शनिवार वाड्यातील लोकांनी ब्राह्मणाच्या मदतीनं नारायणरावावर "नडगेमोडी" वर अंत्यसंस्कार केले. (नडगेमोडी - नडगं म्हणजे गुढगा, नदीच्या पात्रात गुढग्या पर्यन्त पाणी यायची जागा, आजच्या लकडी पुलाजवळ, पोलीस चौकीच्या मागे नदी पात्रात ही जागा आहे )

ह्या दिवशी गंगाबाई पावणे दोन महिन्याच्या गर्भवती होत्या. 

नारायणरावाच्या खुना नंतर शनिवार वाडा सुतकात होता, दुसऱ्या दिवशी राघोबादादाने दरबार भरवला आणि "वैऱ्याचे कसले सुतक" म्हणुन पेशव्याच्या गादीवर जाऊन बसले. १६ वर्षाच्या या मुलीवर असा दुर्दैवी प्रसंग ओढवला असताना. वाड्यावर त्यांना समजुन घेणारे कोण होते ? वाडयावर दोनच स्त्रिया होत्या एक पार्वतीबाई आणि दुसऱ्या आनंदीबाई.

त्या प्रसंगी आनंदीबाईनी गंगाबाईना स्वतःच्या महालात ठेऊन घेतले. यात इतिहासकारांची दोन मते आहेत. एक मत असे की राघोबादादाला नारायणरावाचा वंश संपवायचा होता आणि त्या करता तो कुठल्याही थराला जाऊ शकत होता आणी अशा वेळेस राघोबादादा पासुन गंगाबाईला सुखरूप फक्त आनंदीबाई ठेऊ शकत होत्या. दुसरे मत असे राघोबादादाच्या कारस्थानात आनंदीबाई सहभागी होत्या आणि त्यांनी धाकाने गंगाबाईना ठेवले होते. खरे कारण तो शनिवार वाडाच जाणो.

राघोबादादाना पेशवाईची वस्त्रं तर मिळाली. पण त्यांनी ज्या पध्दतीने ती मिळवली त्यामुळे कारभारी नाराज होते. कारभाऱ्यांच्या गुप्त मसलती चालु झाल्या. कारभारी म्हणजे कोण तर नाना फडणवीस, सखारामबापु, त्र्यंबकराव पेठे, रामशास्त्री, मालोजी घोरपडे. या मंडळींनी ठरवले राघोबादादाला पेशवेपदा वरून दुर करायचे. हेच होते *बारभाई कारस्थान* राघोबाला दुर करून मग कोणाला पेशवे करायचे ? ठरले गंगाबाईच्या नावाने कारभार करायचा. तिला मुलगा झाला तर पुढचा पेशवा. नाही तर दत्तक विधान करायचे. बाहेर काय चालू याची गंगाबाईना अजिबात कल्पना नव्हती ती बिचारी अबला अडकली होती आनंदीबाईच्या महालात.

नाना आणि मंडळी बोलुन चालुन मुत्सद्दी, त्यांनी गंगाबाईना २६ जानेवारी १७७४ ला शनिवार वाड्यातुन सुखरूप बाहेर काढून पुरंदरावर नेले. त्या वेळेस पार्वतीबाई त्यांच्या बरोबर होत्या. ज्या दिवशी गंगाबाई पुरंदरावर पोहोचल्या त्या दिवशी नाना आणि मंडळींनी राघोबा विरुद्ध रणशिंग फुंकले आणि पेशवाईचा कारभार गंगाबाईच्या नावे सुरु केला. पुरंदरावरच पार्वतीबाईनी त्यांचे साधे पणाने डोहाळ जेवण केले.

पुढे जाऊन १८ एप्रिलला, सवाई माधवरावचा जन्म झाला, मुलाचं नाव माधवराव ठेवण्या मागचे कारण थोरल्या माधवरावच्या निधना नंतर पिंडाला कावळा शिवत नव्हता तेंव्हा नारायणना मुलगा झाला तर नाव माधव ठेऊ असा शब्द दिला आणि काक स्पर्श झाला. त्या नंतर ४० दिवसांनी बाल पेशव्याला पेशवाईची वस्त्रे दिली, या संपुर्ण काळात आणि पुढे पेशवाईचा कारभार गंगाबाईच्या नावे चालु होता.

गंगाबाई धोरणी, दक्ष होत्याच याची प्रचिती नारायणरावांची हत्या ते सवाई माधवरावाच्या जन्मा पर्यन्त च्या वागण्यातून येते. त्या धोरणी किँवा दक्ष नसत्या तर पेशव्याचा वंशज जन्माला येणे अवघड होते. त्या अतिशय समंजस होत्या, राज्य कारभाराची माहिती नसल्यामुळे त्यांनी कारभारी मंडळी वर पुर्ण विश्वास टाकला, नित्य कामे कारभाऱ्यावर सोपवली पण महत्वाचे निर्णय किँवा गुप्त खलबत्ताच्या वेळेस जातीने हजर असत. 

पेशव्यांच्या सगळ्या स्त्रियाना देवा धर्माची आवड होती ती आवड गंगाबाई मध्ये पण होती, पण इतर स्त्रिया प्रमाणे त्यांना काशी किँवा इतर तीर्थयात्रांचा योग आल्याचं दिसत नाही.

पुण्यात त्या विषमज्वराने आजारी पडल्या, वैद्य येऊन उपचार करत होते पण तब्बेतीला उतार पडत नव्हता, त्यांना शेवट जवळ आल्याचं कळुन चुकले, त्यांनी सखारामबापुना बोलावले आणि सांगितले "नानांनी आणि तुम्ही मिळोन श्रीमंतांचे आणि दौलती चे रक्षण करावे" या वेळेस सवाई माधवरावाचे वय होते अवघे तीन वर्ष. या माउलीला लेकराची आणि त्या पेक्षा दौलती ची काळजी.

पती पेशवा असताना पेशवीण म्हणुन कधी मिरवता आले नाही आणि मुलगा पेशवा होऊन पेशव्यांच्या मातोश्री म्हणुन आदराच्या स्थानी बसणे नियतीला मंजुर नव्हते. एकूण काय तर भोगले जे दुःख त्यालाच सुख म्हणायचे.

त्या काळात विधवा असुन सकेशा राहिलेली पेशवीण, नारायणरावाच्या मृत्युच्या वेळेस पोटात गर्भ असल्यामुळे शास्त्रा नुसार केशवपन झाले नव्हते.

अशी ही दुर्लक्षित पेशवीण १२ जुलै १७७७ ला विषमज्वराने मृत्यु पावली.

बिपीन कुलकर्णी 

संधर्भ - पेशवे घराण्याचा इतिहास ( प्रमोद ओक)

पेशवाई - कौस्तुभ कस्तुरे 

पेशवाईतीलस्त्रिया

Featured post

Lakshvedhi