Tuesday, 5 October 2021

 [10/5, 4:14 PM] O Mishra: एक सभा में गुरु जी ने प्रवचन के दौरान एक 30 वर्षीय युवक को खडा कर पूछा कि


- आप मुम्बई मेँ जुहू चौपाटी पर चल रहे हैं और सामने से एक सुन्दर लडकी आ रही है , तो आप क्या करोगे ?*


युवक ने कहा - उस पर नजर जायेगी, उसे देखने लगेंगे।


गुरु जी ने पूछा - वह लडकी आगे बढ गयी , तो क्या पीछे मुडकर भी देखोगे ?


लडके ने कहा - हाँ, अगर धर्मपत्नी साथ नहीं है तो। (सभा में सभी हँस पडे)


गुरु जी ने फिर पूछा - जरा यह बताओ वह सुन्दर चेहरा आपको कब तक याद रहेगा ?


युवक ने कहा 5 - 10 मिनट तक, जब तक कोई दूसरा सुन्दर चेहरा सामने न आ जाए।


गुरु जी ने उस युवक से कहा - अब जरा कल्पना कीजिये..* *आप जयपुर से मुम्बई जा रहे हैं और मैंने आपको एक पुस्तकों का पैकेट देते हुए कहा कि मुम्बई में अमुक महानुभाव के यहाँ यह पैकेट पहुँचा देना... 


आप पैकेट देने मुम्बई में उनके घर गए। उनका घर देखा तो आपको पता चला कि ये तो बडे अरबपति हैं। घर के बाहर 10 गाडियाँ और 5 चौकीदार खडे हैं।


उन्हें आपने पैकेट की सूचना अन्दर भिजवाई , तो वे महानुभाव खुद बाहर आए। आप से पैकेट लिया। आप जाने लगे तो आपको आग्रह करके घर में ले गए। पास में बैठाकर गरम खाना खिलाया।


चलते समय आप से पूछा - किसमें आए हो ?

आपने कहा- लोकल ट्रेन में।


उन्होंने ड्राइवर को बोलकर आपको गंतव्य तक पहुँचाने के लिए कहा और आप जैसे ही अपने स्थान पर पहुँचने वाले थे कि उस अरबपति* *महानुभाव का फोन आया - भैया, आप आराम से पहुँच गए..


अब आप बताइए कि आपको वे महानुभाव कब तक याद रहेंगे ?


युवक ने कहा - गुरु जी ! जिंदगी में मरते दम तक उस व्यक्ति को हम भूल नहीं सकते।


गुरु जी ने युवक के माध्यम से सभा को संबोधित करते हुए कहा — "यह है जीवन की हकीकत।"


"सुन्दर चेहरा थोड़े समय ही याद रहता है, पर सुन्दर व्यवहार जीवन भर याद रहता है।"


बस यही है जीवन का गुरु मंत्र... अपने चेहरे और शरीर की सुंदरता से ज़्यादा अपने व्यवहार की सुंदरता पर ध्यान दें.. जीवन अपने लिए आनंददायक और दूसरों के लिए अविस्मरणीय प्रेरणादायक बन जाएगा..

जीवन का सबसे अच्छा योग

सहयोग हैं,

[10/5, 4:27 PM] O Mishra: *चुकवू नये असे काही.....*


दि.७ ते १४ ऑक्टोबर दरम्यान  डीडी सह्याद्री वाहिनीवर दररोज  रात्री ८ वाजता अजरामर अशा "गीतरामायणा"चे प्रसारण होणार असून दि.१५ ऑक्टोबर  विजयादशमी( दसरा) या दिवशी संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून "गीतरामायणाचे" दोन तासांचे विशेष प्रसारण होणार आहे. 


सादरकर्ते- प्रसिद्ध गायक, संगीतकार श्रीधर फडके व सहकारी. 


सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा.

Monday, 4 October 2021

 सार्वजनिक नवरात्रौत्सव 2021 बाबत

गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

 

मुंबई दि. 4 : गृह विभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवरात्रोत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दि. ७ ते १५ ऑक्टोबर२०२१ दरम्यान नवरात्र / दुर्गापुजा /दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी, अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करून उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. त्याअनुषंगाने मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

कोवीड- १९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वनआपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसन विभागाने "ब्रेक द चेन" अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे. सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका / स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.

यावर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरीता ४ फूट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची २ फूटांच्या मर्यादेत असावी. मागील वर्षी प्रमाणे शक्यतो देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

नवरात्रौत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावाजाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच "माझे कुटुंबमाझी जबाबदारी" या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबादांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्यविषयक उपक्रमे / शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोनामलेरियाडेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.

देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईनकेबल नेटवर्कवेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी तसेच देवीच्या मंडपांमध्ये प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. आरतीभजनकीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे. मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपांमध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई असेल. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरीकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.

महापालिकाविविध मंडळेगृहनिर्माण संस्थालोकप्रतिनिधीस्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्वीकृती केंद्रांची व्यवस्था करावी व याबाबत जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यात यावी.

विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्रात असेल तरमूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.

दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा. रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत. त्यांना फेसबुक इत्यादी समाजमाध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे सोहळा बघण्याची व्यवस्था करावी.

            कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसनआरोग्यपर्यावरणवैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिकापोलीस स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत स्थानिक प्रशासनाकडून अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक आहे.

००००

 पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचा समावेश वैद्यकीय शिक्षण विभागाच्या

सेवा प्रवेश नियामांमध्ये करण्यात यावा

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

 

            मुंबईदि. 4 पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी या अभ्यासक्रमाचा समावेश वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये करण्यात यावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पॅरामेडिकल कोर्सबाबत बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजयवैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकरउपसचिव प्रकाश सुरवसेउपसचिव सुरेद्र चानकरवैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे डॉ. सुशिल दुबेडॉ. अरुणकुमार व्यास यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.देशमुख म्हणाले कीसध्या राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 13 पॅरामेडिकल कोर्सेस (बॅचलर इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी) सुरु असून साधारणपणे यासाठी 2000 जागा उपलब्ध आहेत. या पदवीधारक विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याबरोबरच अधिकाधिक मनुष्यबळ शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

            पॅरामेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील माहिती अधिक होण्याकरिता जिल्हास्तरावरील महाविद्यालयांमार्फत जास्तीत जास्त वृत्तपत्रात प्रसिध्दी देण्यात यावी. पॅरामेडिकल अभ्यासक्रम हे कौशल्यावर आधारीत पदवी अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमांची आवश्यकता असल्याचे कोविड-19 काळात दिसून आले आहे.येणाऱ्या काळात या 13 अभ्यासक्रमांमधील कोणत्या अभ्यासक्रमांची पुर्नरचना करणे आवश्यक आहे याबाबतचा अभ्यास करुन त्यांची पुर्नरचना वैद्यकीय शिक्षण संचालक यांनी करावी. तसेच अभ्यासक्रमाच्या पाठयक्रमामध्ये आवश्यक बदल व श्रेणीवर्धनाच्या दृष्टीने अभ्यासगट म्हणून उच्च स्तरीय समिती गठीत करुन त्याची पुर्नरचना करण्यात यावी, असे निर्देशही श्री.देशमुख यांनी दिले.

००००


 

महावितरण कंपनीची विद्युत सहायक पद भरती प्रक्रिया पारदर्शक

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

 

            मुंबईदि. 4 : महावितरण कंपनीची विद्युत सहायक पद भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यात आली असून कागदपत्रांची तपासणीही दक्ष राहून करण्यात येणार आहे. कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नसल्याचे उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

            एच एस बी सी, फोर्ट येथील महावितरण कंपनीच्या इमारतीत राज्यातील निवडक विद्युत सहायक उमेवारांच्या शंका निरसन करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

            ऊर्जा राज्यमंत्री श्री.प्राजक्त तनपुरे म्हणाले, दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल पारदर्शकपणे जाहीर करण्यात आला आहे. या निकालाबाबत माध्यमांतून आणि समाजमाध्यमातून चुकीच्या पद्धतीने प्रसार करण्यात येत होते. याकरिता राज्यातील विविध भागातून विद्युत सहायक पदासाठी अर्ज केलेले आणि या निकालावर शंका असलेल्या उमेदवारांना बोलावून त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले आहे. निकालात कसल्याही प्रकारची चुक झाले नसल्याचे श्री.तनपुरे यांनी स्पष्ट केले.

            सर्व निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामध्ये कट ऑफराखीव जागाआरक्षणगुणांकन आदी बाबी स्पष्ट होतील. त्यानंतर कोणाचीही शंका राहणार नाही. भरती प्रक्रिया लवकर पुर्ण करण्यासाठी कागदपत्रे तपासणी करून नियुक्ती पत्रेही देण्यात येणार आहेत. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक होत आहे. सर्व उमेदवारांना न्याय मिळणार आहे. कोणीही कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन श्री.तनपुरे यांनी यावेळी केले.

 अणुउर्जेसह व्यापारपर्यटन व सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यास अर्जेंटिना उत्सुक

: ह्यूगो जेवियर गोबी

·       अर्जेंटिनाच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

 

            मुंबई, दि. 4 : अर्जेंटिना भारताशी अणुऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात सहकार्य करीत असून व्यापारसंस्कृती आणि पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास उत्सुक असल्याचे अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत  ह्यूगो जेवियर गोबी यांनी सांगितले.  

            राजदूत ह्यूगो जेवियर गोबी यांनी सोमवारी (दि. ४ ऑक्टो) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली,  त्यावेळी ते बोलत होते.

            भारताप्रमाणेच  अर्जेंटिना देखील विलक्षण सुंदर देश आहे. 2019 मध्ये अर्जेंटिनाच्या २ दशलक्ष पर्यटकांपैकी केवळ १४००० पर्यटक भारतात आले तर भारताच्या १३ दशलक्ष पर्यटकांपैकी अवघे ८००० पर्यटक अर्जेंटिना पाहण्यास आले. हे चित्र बदलून उभय देशातील परस्परांच्या पर्यटकांची संख्या वाढली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

मेसीचे चाहते भारतात अधिक : राज्यपाल

            भारतात पर्यटनाच्या अनेक संधी असून अर्जेंटिनाने पर्यटन वाढविण्यासाठी सहकार्य करावे असे राज्यपाल कोश्यारी यांनी राजदूतांना सांगितले. फ़ुटबाँल भारतात लोकप्रिय खेळ असून अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटू मेसीचे चाहते अर्जेंटिनापेक्षा भारतात अधिक असल्याचे तसेच दंतकथा झालेले दिएगो मॅराडोना सर्वपरिचित असल्याचे राज्यपालांनी सांगितले. 

            बैठकीला अर्जेंटिनाचे मुंबईतील वाणिज्यदूत गिलर्मो एड्युआर्दो डेव्होतोउपवाणिज्य दूत सिसिलिया मोनिका रिसोलोअर्जेंटिना दूतावासातील राजकीय विभाग प्रमुख रेनाटो मोरालेस हे उपस्थित होते.

*****


Argentinian Ambassador meets Governor Koshyari

Calls for enhancing relations in Trade, Tourism and Culture

            Stating that Argentina has lots of ongoing cooperation with India in the field of nuclear research, the Ambassador of Argentina to India Hugo Javier Gobbi called for strengthening the cooperation with India in the areas of trade, tourism and culture.

            The Ambassador was speaking to Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai on Monday (4th Oct) during a courtesy call. 

            Calling for a major fillip to tourism between India and Argentina, the Ambassador said Argentina, like India, is an incredibly beautiful country. He however lamented that only 8000 tourists from out of 13 million Indian tourists visited Argentina in the year 2019 while only 14000 tourists from Argentina’s 2 million tourists visited India.

More Messi fans in India : Governor

            Stating that India offers tremendous opportunities for tourism, the Governor sought cooperation from Argentina in increasing tourism. The Governor said football is a popular sport in India and added that there are more fans of Messi in India than perhaps in Argentina. He said Argentinian football legend Diego Maradona is a household name in the country.

            The Consul General of Argentina in Mumbai Guillermo Devoto, Deputy Consul General Cecilia Risolo and Head of Political Section in the Embassy of Argentina Renato Morales were present.

 विविध मागण्यांसंदर्भात ‘मार्ड’ पदाधिकाऱ्यांची

मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

·       योग्य तोडगा त्वरित काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

 

            मुंबई, दि. 4 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपल्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याबद्धल निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने समाधान व्यक्त केले आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा येथे भेट घेतली. यावेळी सकारात्मक चर्चा होऊन मार्डने मांडलेल्या मुद्द्यांवर योग्य तो तोडगा त्वरित काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

            कोरोना काळात निवासी डॉक्टरांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांचे कौतुक करून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले कीया डॉक्टरांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करुन निर्णय घेतले जातील. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेअतिरिक्त मुख्य सचिव वित्त मनोज सौनिकसंचालकवैद्यकीय शिक्षणचे डॉ.दिलीप म्हैसेकरवैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजयअतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी  उपस्थित होते.

            वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क माफ करणेपालिकेच्या महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमधून जीएसटी कपात बंद करणे यासंदर्भात मार्डने संप पुकारला होता.

            शैक्षणिक शुल्क माफी तसेच जीएसटीसंदर्भात  मुख्यमंत्र्यांनी वित्त विभाग तसेच पालिकेस तांत्रिक बाबींचा अभ्यास करून  योग्य कार्यवाही करण्यासंदर्भात त्वरित पाऊले उचलावी असे सांगितले. त्याचप्रमाणे शासकीय तसेच पालिकेतील निवासी डॉक्टरांनी कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल योग्य ती दखल घेऊन त्यांना कशा प्रकारे प्रोत्साहन देता येईल ते निश्चित करण्याचेही निर्देश दिले.

            यावेळी मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले व राज्यशासन योग्य ती पाऊले उचलेल असा विश्वास व्यक्त  केला.

 नवीन महाविद्यालयअभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे

वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय

 

            नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये नवीन महाविद्यालयपरिसंस्था सुरु करणे तसेच नवीन अभ्यासक्रमविषयविद्याशाखाअतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची पद्धत निश्चित केली आहे.  कोविडमुळे वर्ष 2021-22 मध्ये विहित वेळेत कार्यवाही होऊ न शकल्याने हे वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.  या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल.

-----०-----


 

मी धनंजय बोलतोयतुम्ही व्यवस्थितसुरक्षित आहात ना

काळजी करु नका - धनंजय मुंडेंचा पुरात अडकलेल्यांना धीर

शेतकऱ्यांना नुकसानीची सरसकट नुकसानभरपाई मिळावी

यासाठी पाठपुरावा करणार

- मंत्री धनंजय मुंडे

मांजरा काठी पूर परिस्थितीधनंजय मुंडे घटनास्थळी,

रात्रीतून वेगाने मदतकार्य झाल्याने जीवितहानी टळली

 

            अंबाजोगाई, दि. 28 : "मी धनंजय बोलतोयतुम्ही व्यवस्थितसुरक्षित आहात नाकिती जण व कुठे अडकलेले आहातबोट मदतीला आली आहे काकाळजी करू नका;" असे बोलून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथे मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांना धीर देत त्यांची विचारपूस केली.

            देवळा ता.अंबाजोगाई येथील 51 जण मांजरा नदीच्या पुरात अडकले असून त्यापैकी 27 जणांना आतापर्यंत सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर उर्वरित नागरिकांना सुरक्षा रक्षक जवान बोटीने बाहेर काढत आहेत. मांजरा नदीच्या काठी पूर परिस्थितीने नुकसान झालेल्या गावांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची व नुकसानीची पाहणी केली व एन डी आर एफ सह अधिकाऱ्यांकडून बचाव कार्याची माहिती घेतली.

            मागील 24 तासात जिल्ह्यात सर्वदूर तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाली असून बऱ्याच गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावांमध्ये घरात पाणी शिरले असून त्याठिकाणी नागरिकांना आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे.

            सबंध रात्रभर आपण जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून दर तासाला जिल्ह्यातील एकूण उपाययोजनेची व उपलब्ध यंत्रणांची माहिती घेत आहे व एन डी आर एफ सह अन्य बचाव पथकांना आवश्यक सूचना देत आहोतएन डी आर एफअग्निशमक सह पथके बचाव कार्यात तैनात आहेतहेलिकॉप्टर सुविधेसाठी वातावरण पूरक नसले तरी त्याचीही तयारी करून ठेवलेली आहेअसे श्री.मुंडे म्हणाले.

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी पाठपुरावा करणार

            काल रात्रीच या संपूर्ण परिस्थितीबाबत मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री  श्री.अजित पवार यांच्याशी चर्चा केली असून त्यांना जिल्ह्यातील एकूण परिस्थितीची माहिती दिली आहे.

            मागील पंधरवाड्यात तीनवेळा अतिवृष्टी झाली त्यामुळे शेती नुकसानीचे पंचनामे करताना आकडेवारी बदलत आहेत. मात्र, आता काही महसूल मंडळांमध्ये शेती मध्ये काहीच उरले नाही. अक्षरशः जमीन खरडून गेली आहेत्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे श्री.मुंडे म्हणाले.

            यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणेमाजी आमदार पृथ्वीराज साठेज्येष्ठ नेते राजेश्वर आबा चव्हाणदत्ता आबा पाटीलगोविंदराव देशमुखताराचंद शिंदेतानाजी देशमुखरणजित चाचा लोमटेअजित गरड यांसह अधिकारी व बचाव पथकातील कर्मचारी उपस्थित होते.

0000


विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी

मतदार यादीत नावे नोंदविण्याची व दुरुस्तीची संधी

- राज्य निवडणूक आयुक्त

            मुंबईदि. 28 (रानिआ) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत पात्र नागरिकांना मतदार यादीत नावे नोंदविण्याची आणि मृतदुबार अथवा स्थलांतरीतांची नावे वगळण्याची चांगली संधी आहे. त्याबाबत विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांनी समन्वयाने व्यापक व प्रभावी जनजागृती मोहीम राबवावीअसे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिले.

            भारत निवडणूक आयोगातर्फे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मतदार जागृती अभियानाच्या तयारीबाबत श्री. मदान यांनी आज जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ काँफरन्सिंग) संवाद साधला. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेराज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकरबृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणीकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशीमुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील स्वीप सल्लागार दिलीप शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

             श्री.मदान यांनी सांगितले कीभारत निवडणूक आयोगातर्फे तयार करण्यात येणारी विधानसभा मतदारसंघांचीच मतदार यादी महानगरपालिकानगरपरिषदा/ नगरपंचायतीजिल्हा परिषदा/ पंचायत समित्या व ग्रामपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. त्यामुळे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या कालावधीत 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून आपली नावे नोंदवावित. त्याचबरोबर मृतदुबार/ समान नोंदीदेखील वगळता येतील. आवश्यक असल्यास पत्त्यात अथवा नावांत दुरूस्त्याही करता येतील. या कार्यक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. त्याकरिता मुद्रितइलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाबरोबरच विविध कल्पक बाबींचाही अवलंब करावा.

            श्री. देशपांडे यांनी सांगितले कीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याच्या दृष्टीने आताच मतदार म्हणून आपले नाव नोंदविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मतदार यादी अद्ययावत आणि अधिकाधिक बिनचूक करण्यासाठीदेखील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नावांमध्ये दुरूस्त्या असल्यास त्याही कराव्यात. मृतांची अथवा दुबार नावे वगळावयाची असल्यास नमुना क्रमांक 7 भरून तो संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा संबंधित ठिकाणी जमा करावा अथवा ऑनलाईन पद्धतीने www.nvsp.in या संकेतस्थळावर भरावा. या संकेतस्थळावर नवीन मतदार म्हणूनदेखील नाव नोंदणी करता येते.

            श्री. कुरुंदकर यांनी सांगितले कीआगामी काळात मोठ्याप्रमाणावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी मतदार म्हणून नावे नोंदविण्याची किंवा मतदार यादीत दुरूस्त्या करण्याची ही शेवटची संधी आहे. याबाबत नागरिकांना व मतदारांना अवगत करणे आवश्यक आहेतसेच ही सर्व प्रक्रिया अधिकाधिक सुलभ केल्यास नागरिकांचा चांगला प्रतिसादही लाभेल. त्यादृष्टीने सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिकेच्या यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करावे.

Salutes to art

 


Featured post

Lakshvedhi