Sunday, 3 October 2021

 शिर्डी विमानतळाच्या सभोवताली सर्व सुविधायुक्त

शहर वसविण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

 

           मुंबई, दि. 29 : विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र याठिकाणी वसवावे अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत श्री.ठाकरे बोलत होते. वर्षा येथील समिती कक्षात झालेली ही ७६ वी बैठक होती. एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच "आशा" असे या भागाचे नाव असेल. या भागाचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नावीन्यपूर्ण आणि सुनियोजित विकास  करणार आहे.

                यावेळी  मुख्यमंत्र्यांचे अपर  मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूरविमानचालन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर - सिंहसिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.नितीन जावळे उपस्थित होते. याशिवाय नागपूर येथून विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे- वर्मानागपूर महापालिका आयुक्त बी. राधाकृष्णननागपूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती आर विमला हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

                अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे देशातील एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी येथे देश विदेशातून लाखो पर्यटक भेट देत असतात.शिर्डी विमानतळ व सभोवतालच्या परिसराचा विकास झाल्यास तेथे विविध प्रकल्पांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि हे राज्यातील उत्तम विकास केंद्र बनेल,रोजगार निर्मिती होईल व विमानतळ परिसरात पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने पर्यटन व्यवसाय आणखी वृध्दींगत होईल याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

उपयोगिता लक्षात घेवूनच विमानतळाचा विकास व्हावा

            केवळ विकासाच्या नावाखाली विमानतळ सुरू करून त्याचा विकास करण्यात येवू नये तर जेथे औद्योगिक विकास होऊ शकेल ,पर्यटनाला चालना मिळेलरोजगाराच्या संधी निर्माण होतील अशा भागात विमानतळ उभारणी आणि त्यांचा विकास करावा असे निर्देशही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले.

            नागपूर मिहान मधील ज्या विविध कंपन्यांना जागा देण्यात आली आहे त्याचाही आढावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला व तेथे उत्पादन योग्य रीतीने सुरू ठेवण्याबाबतही निर्देश दिले.

            बैठकीत राज्यातील विविध विमानतळाच्या विकासकामांचा तसेच तेथील सेवा-सुविधाविमानतळ विकास कंपनीच्या गतवर्षभरातील वाटचालीचा आढावा घेण्यात आला.

00000


 

अतिवृष्टीमुळे सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या

विद्यार्थ्यांना पुन्हा संधी

9 व 10 ऑक्टोबरला होणार परीक्षा

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

 

          मुंबईदि. 29 :  राज्यात काही जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, या नैसर्गि‍क आपत्तीमुळे काही विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत अथवा तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा पूर्ण करु शकले नाहीतअशा उमेदवारांनी ई-मेलद्वारेकार्यालयीन दूरध्वनीकेंद्र प्रमुख भेट आणि स्वत: सीईटी कक्षात येवून प्रत्यक्ष भेटीदरम्यान परीक्षा देवू न शकल्याची विविध कारण सीईटी कक्षाकडे नोंदविली आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी कोरोना झाल्यामुळे, अतिवृष्टी, डेंग्यूमलेरीयाटायफाईड इ. साथीचे आजारवाहतुकीची कोंडीरस्ते दुर्घटना इ. मुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यास अडचण एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यामुळेपरीक्षेच्या पहिल्या सत्रात 30 मिनिटाच्या आत तांत्रिक अडचण निर्माण होणेपरीक्षेला प्रत्यक्ष हजर असूनसुद्धा तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेचा पूर्ण वेळ न मिळणे अशी कारणे नमूद केली आहेत.

            या कारणांचा सहानुभूतीपूर्वक विचार करता तसेच उमेदवारांचे शैक्षणिक हित लक्षात घेता पीसीएम ग्रुप करिता जवळपास 27 ते 30 हजार उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन परीक्षा देवू शकले नाहीत अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्यासाठी अंतिम संधी देण्यात देण्यात येणार आहे.

            श्री.सामंत म्हणाले, वरील कारणांचा विचार करता पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही ग्रुपच्या पात्र उमेदवारांना दि.1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर 2021 या कालावधीत वरील कारणांना अनुसरुन ईमेल व एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी परीक्षाशुल्क यापूर्वी भरले असल्यामुळे त्यांची निशुल्क नोंदणी करुन घेण्यात येईल. तसेच नोंदणी केलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रांच्या उपलब्धतेनुसार केंद्र व नव्याने प्रवेशपत्र उपलब्ध करुन देऊन दि.9 व 10 ऑक्टोबर 2021 रोजी पीसीएम व पीसीबी ग्रुपच्या अतिरिक्त परीक्षा घेण्यात येणार आहे.

            विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नयेम्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालक यांनी काळजी करू नयेअसे आवाहनही श्री. सामंत यांनी केले.

0000

 



 

Suprabhat

 Jai bharat,jai maharashtra: *चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो* 

*मग संकट कितीही मोठे असू घा...*

*फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्र्वास कायम ठेवा.,आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,*

*पण जोडणं हा आयुष्याचा मेळ असतो....*

: *🌹"" कोणत्याही क्षेत्रात नेत्रुत्व करणे म्हणजे हुकुमत गाजवने नसून, जबाबदारी स्वीकारून लोकांना, योग्य दिशा दाखवून, सोबत घेवुन प्रगती करणे होय..."*

*माणसांचा संग्रह करणं इतकंही सोपं नसतं, जितकं पुस्तकांचा संग्रह करणं.*

        *कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते.*


        

Saturday, 2 October 2021

Jai jawan jai kissan

 नुकताच पाहिलेल्या ताशकेंत फाईल्स चित्रपटाने डोक्यात न संपणाऱ्या प्रश्नांची सहस्त्रावर्तन सुरु झाली आहेत. मुळातच चित्रपटाच्या नावापासूनच शंकासुर थैमान घालायला सुरुवात करतो. स्वतंत्र भारताचे, दुसरे पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या ११ जानेवारी १९६६ साली ताशकेंत इथे झालेल्या संशयास्पद मृत्यूबद्दल अनेक अनुत्तरित प्रश्नांना  तोंड फोडणारा हा चित्रपट  १२ एप्रिल रोजी रिलीज झाला.  कुठलीही 'खानावळ'  नसताना,अंगप्रदर्शनाचं एकही दृश्य किंवा कुठलंही आयटम सॉंग नसताना , दोन दिवसात  सव्वा कोटीहून जास्त कमाई करणारा हा चित्रपट  रेटिंग कसोटीवरही अव्वल ठरावा असाच आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता असा रूढ समज ह्या देशात गेली काही वर्ष पद्धतशीरपणे रुजवला गेला आहे. मात्र ह्या चौथ्या स्तंभाला स्वत:च्या अस्तित्वाला टिकवण्यासाठी काय काय करावं लागतं हेही अलीकडे ठळकपणे दिसून येतं . या स्तंभाला आपला डोलारा सांभाळण्यासाठी ब्रेकिंग न्यूज,चटपटीत हॅपनिंग स्कुप्स, मुलाखती मिळवाव्या लागतात. अश्याच एका मिडिया हाऊसमध्ये काम करणाऱ्या  तरुण राजकीय पत्रकार रागिणी फुले ला चटपटीत स्कुप मिळवण्यासाठी हातात फक्त आठ दिवस हातात असतात. या स्कुप सिननंतर सुरु झालेला चित्रपट पुढचे  सव्वा दोन तास अनेक प्रश्नांचे अनुत्तरित गुंते आपल्या समोर ठेवतो.


"ये देश गांधी और नेहरू का है  "। " शास्त्री का क्यूँ नहीं "।  या रागिणीच्या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर  नाही हे चित्रपट पाहात असताना पदोपदी जाणवतं .  १९६५  पाक युद्धात, शास्त्रीजींच्या नेतृत्वालाखाली देश लढला आणि पाकिस्तान नेस्तनाबूत केलं गेलं. "जय जवान, जय किसान" हा प्रसिद्ध नारा अजरामर करणाऱ्या  शास्त्रीजींना मात्र  हा देश शब्दशः विसरलाय . ह्या चित्रपटामुळे, शास्त्रीजींना देश विसरलाय की देशाला शास्त्रीजींना विसरायला लावलंय? हा प्रश्न विचार करू शकणाऱ्या प्रत्येक भारतियाला छळू शकतो. गेल्या  काही दिवसांमध्ये बायोपिक बनवण्याचं प्रमाण वाढलेलं असून ताशकेंत फाईल्स मात्र बायोपिक नाहीये ही जमेची बाजू आहे. १९६६ साली भारत  युद्धाच्या संपुष्टीसाठी तत्कालीन सोव्हिएत संघाने केलेल्या मध्यस्तीमुळे, उजबेकिस्तानच्या ताशकेंत इथे भारत पाक यांच्यात झालेल्या ताशकेंत करारावर सही  करण्यासाठी शास्त्रीजी आठवडाभर तिथे मुक्कामास होते.  ताशकेंतहुन आल्यावर ,"कुछ बातें बतानी है"। असं शास्त्रीजींनी आपल्या कुटुंबियांना सांगितलं होतं . करारावर सह्या झाल्यानंतर, त्याच रात्री शास्त्रीजींचा संशयास्पद मृत्यू होतो. 


देशाच्या अतिशय महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीचा परदेशात अचानक, तोही संशयास्पद,मृत्यू होतो. त्याबद्दल ना मीडियात काही बोललं जातं ना सरकार दरबारी. ताशकेंत सारख्या थंड ठिकाणी , तेही भर जानेवारीत शास्त्रीजींचा मृत्यू झाल्यावर, पंधरा तासांनी त्यांचं शव भारतात दिल्लीत आणलं जातं . दिल्लीतही  त्या काळात बोचरी थंडी असल्याने, बर्फातल्या प्रेताची अवस्था खराब होण्याचं काही कारणंच नाही असा विचार आपल्या मनात सहज येऊ शकतो. पण भारतात परत आणलेल्या शास्त्रीजींच्या शरीरावर कापल्याच्या खुणा , जखमा आणि कपड्यांवर रक्त असण्याबद्दल सगळेच  मौन बाळगून असतात. देशात, बेवारस मेलेल्या व्यक्तीचंही पोस्ट मॉर्टेम केलं जातं . पण याच देशाच्या पंतप्रधानाचं ना पोस्ट मॉर्टेम होतं ना त्यांच्याबद्दल कुठे चकार शब्द लिहिला जातो. रागिणी फुले ही शोधपत्रकार जेव्हा ह्या सत्याला समोर मांडते तेव्हा आपण बधिर झालेले असतो. शास्त्रीजींच्या कुटुंबियांचे इंटरव्ह्यू सांगतात की त्यांची दररोजची नोंदी असणारी लाल डायरी आजवर मिळाली नसून त्यांच्या वापरातला थर्मासही गायब करण्यात आला, ज्यातून त्यांना शेवटचं दूध देण्यात आलं . शास्त्रीजी मृत्यू होतानांही त्या थर्मासकडे निर्देश करत होते. मृत्यूबद्दल बनवलेले दोन रिपोर्ट्स, आजाराच्या नावांशी केलेले चतुर शब्दच्छल, आठापैकी दोन मुख्य रशियन डॉक्टर्सच्या नसलेल्या सह्या , शास्त्रीजींच्या शरीराचा बदललेला रंग, कपाळावरचे दोन पांढरे ठिपके [ जे फोटोतही स्पष्ट दिसत असतात ] आणि सर्वात शेवट ... मृतदेह ताब्यात घेतल्यावर, बाजूलाच इंदिरा गांधींच्या चेहेऱ्यावरचे 'ते' भाव .... सगळं अंगावर येतं बाप्पा .


चित्रपट बनवताना विवेक अग्निहोत्रीने सिस्टीमच्या  फुलप्रूफ थोबाडीत मारलीय. कुठेही ढिसाळंच काय, हुशार चूकही केलेली नाहीये. दिल्ली ल्युटेन्स वर्तुळाचं आणि सत्तेचं आपापसातलं साटंलोटं मांडताना विवेकने मीडियातले प्रेस्टिट्यूट्स , तथाकथित उच्चभ्रू इतिहासकार , सुप्रीम कोर्टाचे निवृत्त जज् , गुप्तहेर संघटनेचे निवृत्त प्रमुख, सो कॉल्ड बुद्धिजीवी साहित्यकार सारख्यांना धोबीघाटावर धुतल्यासारखं धुवून काढलंय. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधान मानत  नाही, त्यांच्यापासून संविधानाला , देशाला धोका आहे, संविधानाची तोडमोड करणारे सत्तेवर बसलेत अशी रडारड करणारे देशात आणीबाणी लागू करतात आणि बाबासाहेबांनी लिहिलेल्या मूळ संविधानात हवा तसा बदल जबरदस्तीने घडवून आणतात आणि त्याबद्दल चकार शब्दही उच्चारला जात नाही हे पुराव्यानिशी पडद्यावर झळकतं आणि आपण सुन्न होतो.  


चित्रपटाच्या शेवटी डॉक्युमेंट्स मध्ये  काही नावं शाई लावून झाकलेली दिसतात. पण नीट वाचताना सगळे संदर्भ लगेच लागत जातात. स्वातंत्र्योत्तर काळात निव्वळ एकाच घराण्याची  लोकशाही नामक गोंडस शब्दाखाली सुरु असलेली  घराणेशाही ,दंडेलशाही ही अशी उघडंनागडं सत्य म्हणून समोर ठेवली जाते.या देशात, नागरीकाला सत्य जाणण्याचा हक्क नाही ? तुम्ही त्या घराण्याचे गुलाम, भक्त किंवा हुजरे असाल तर तुमच्यासाठी हा चित्रपट थोतांड वाटलं तरी डोक्यात विचारचक्रं  सुरु करू शकतो. जे भक्त नाहीत ते या विचार सरणीचा निषेध करायच्या मार्गाला लागतील. आणि जे राष्ट्र प्रथम, राष्ट्रनिष्ठा प्रथम या विचारांवर विश्वास ठेवत असतील , ते या घराण्याच्या द्वेषाचं जोमानं समर्थन करतील हे नक्की. चित्रपटात, नेताजींच ताशकेंत करारावर शास्त्रीजी सही करत असताना, तिथे उपस्थित असणं एका खऱ्या फोटोतून दाखवलं गेलय . हा अजून एक धक्का! शास्त्रीजींच्या मृत्यूमुळे  काय माहीत इतिहासात काय गाडून टाकलंय? इतकी वर्षं सत्याची  मुस्कटदाबी केली, पण असे गड़े हुए मुर्दे बाहेर येणारच.


शास्त्रीजींसारख्या तळागाळातून पुढे आलेल्या काँग्रेसच्याच, गांधीवादी नेत्याला , त्यांच्या लोकप्रियतेला शह  देण्यासाठी काय केलं गेलं असेल ? ही घराणेशाही किती बेरड आहे हे निर्भयपणे मांडण्यासाठी विवेक अग्निहोत्रीचं  अभिनंदन. मिथुन चक्रवर्ती आणि श्वेता बासू प्रसाद चा अभिनय बाप ! पल्लवी  जोशी,मंदिरा बेदी, पंकज त्रिपाठी, यांनी यथार्थ भूमिका निभावल्या  आहेत. मला नाही वाटत, या चित्रपटासाठी नासिरुद्दीन मियाँना स्वतंत्र डायलॉग्ज लिहून  दिले असतील. अगदी मनापासून आपलं स्वत्वं कॅमेऱ्यासमोर प्रकट केलंय त्याने. अगदी शोभलाय हा माणूस  ! याच मनोवृत्तीच्या  लोकांमुळे २ ऑक्टोबर गांधीजींसाठी लक्षात ठेवायचं हे  आपल्या मेंदूवर शालेय जीवनापासून कोरल गेलंय . हेच लोकं २ ऑक्टोबर शास्त्रीजींचा जन्मदिवस असतो हे कुठेही सांगत नाही. हे आहे देशाच्या मेंदूचं झालेलं 'ब्रेनवाॅशिंग'.  देश गांधी नेहेरुंचा नाही, पटेल शास्त्री सुभाष ,लाल बाल पाल यांचाही आहे हे आज स्पष्टपणे सांगायचं सबळ उदाहरण हा चित्रपट देतो. शास्त्रीजी एकदाच नाही, दोनदा निधन पावले. एकदा परदेशात, नि दुसऱ्यांदा स्वदेशात. अगदी बोल्ड अक्षरात लिहितेय, आवर्जून मिळेल तिथे हा चित्रपट पहाच. डोन्ट मिस द चान्स .

©️रुपाली पारखे देशिंगकर


* पोस्ट नावासकट शेअर करायला परवानगीची गरज नाहीच. कटूसत्य लोकांपर्यत पोहोचलंच पाहिजे.

Mera bharat mahan,jai jawan,jai kisan

 *फार आग्रह केल्यानंतर वरदक्षिणा म्हणून फक्त चरखा मागणारे शास्त्रीजी* 

....  परिवहन मंत्री असताना भारतातल्या पहिल्या महिला कंडक्टर ची नेमणूक करणारे शास्त्रीजी

....... *गृहमंत्री म्हणून काम करताना लाठी ऐवजी पाणी वापरण्यास सांगणारे शास्त्रीजी*

...... वयाच्या दीड वर्षी वडील गमावल्यानंतर कित्येक मैल भर दुपारी अनवाणी चालत काॅलेजला जाणारे शास्त्रीजी


...... *पुस्तके डोक्यावर बांधून दररोज दोन वेळा नदी पोहून शाळेत जाणारे शास्त्रीजी*


..... एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे  स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा देणारे शास्त्रीजी


....... *गरीब लोकांची घरे पाडावी लागू नये म्हणून घरी पायी जाणारे पंतप्रधान शास्त्रीजी*

 

...... पंतप्रधान असताना मुलाच्या काॅलेज अर्जावर आपला हुदा सरकारी कर्मचारी लिहिणारे शास्त्रीजी


...... *पाकिस्तानला सर्वात प्रथम पाणी पाजणारे, जय जवान जय किसान जयघोष करत सैनिकांसाठी पुर्ण देशासोबत दर सोमवारी उपवास करणारे शास्त्रीजी*


...... पंतप्रधान असताना खासगी कामासाठी सरकारी गाडी वापरल्यावर लगेच त्याचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करणारे शास्त्रीजी


   *_मृत्यू नंतर त्यांच्या नावावर घर जमीन मालमत्ता काहीच नव्हते, होते फक्त फियाट घेण्यासाठी घेतलेले कर्ज. आणि बँकेने ते कर्ज शास्त्रीजींच्या पश्चात त्यांच्या पत्नी कडून वसूल केले._*

.

म. गांधीजींच्या जयंतीच्या गदारोळात त्यांचा हा कर्मयोगी शिष्य नेहमी झाकोळला जातो. 

असे साध्या पण निग्रही, मृदु स्वभावाचे पण कर्तव्यकठोर वृत्तीचे, सगळ्यात कमी कालावधीत मोठा प्रभाव टाकणारे *आपले दुसरे पंतप्रधान  लालबहादुर शास्त्रीजी, त्यांना अनंत दंडवत....🙏*


 *यातला एक तरी गुण आजच्या  पुढार्यामधे आहे का?*

 विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे तर जात नाही ना याचा विचार करण्याची गरज

                                                     - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       वन्यजीव सप्ताह शुभारंभ सोहळा

       मुंबई, दि. 1 : आपण स्वतःला या पृथ्वीचे मालक समजू लागलो आहोतजमिनीवरचा कायदा हा आपला आहे. पण निसर्गाचे नियम त्यापेक्षा वेगळे आहेत. ते नियम आपण पाळले नाही तर  निसर्ग त्याच्या पद्धतीने न्याय करतो. विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे तर जात नाही ना याचा विचार करण्याची गरज आहे असे सांगून आपल्याला आपले वन आणि वन्यजीव वैभव जपायचे आहेच. त्यासाठी जगा आणि जगू द्या हा मूलमंत्र गाठीशी बांधत पुढं जाऊया असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन्यजीव सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी केले.

         सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याहून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. तर सह्याद्री अतिथी गृह येथे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेवन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी,प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) जी. साई प्रकाशप्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमयेअपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी आदि मान्यवर उपस्थित होते.तर राज्यभरातून वन विभागातील अधिकारी ,कर्मचारी,वन्यप्रेमी नागरिक  दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

        मुख्यमंत्री श्री.ठाकरे पुढे म्हणाले,आपण कायदे करतो आणि आपल्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावतो. विकासाचे वेडे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कोणता विनाश करत आहोत हे न बघता आज आपण पुढं जात आहोत.चक्रीवादळअतिवृष्टी ही त्याची उदाहरणे आहेत.आपण वनांमध्ये घुसखोरी करीत आहोत. निसर्गावर आपण आक्रमण केले आणि ते असह्य झाले की निसर्ग आपले अतिक्रमण आपल्या पद्धतीने दूर करतो.त्यामुळे समजूनविचार करून पुढे जाणे गरजेचे आहे.वनवन्यजीव आणि पर्यावरणाप्रती लोकांमध्ये जशी जनजागृती झालीच पाहिजे तशीच ती राजकीय नेत्यांमध्येही झाली पाहिजे असे मत मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी व्यक्त केले.

शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा

     शालेय विद्यार्थ्यांमध्ये वनवन्यजीव संरक्षण आणि संवर्धन यासंदर्भातील रुची निर्माण करण्यासाठी अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश व्हावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.नाशिकला 'मित्रा'नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे.या संस्थेत  पर्यावरणपूरक विकास कसा करायचा या संबंधीचा अभ्यास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

           अन्न,वस्त्र,निवारा या मानवी मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीत्यातही निवाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी आपण वस्त्या वाढवत आहोतजंगलांमध्ये जात आहोत. वाढणाऱ्या मानवी वस्त्यांना मूलभूत सुविधा,पाणी कसे द्यायचे याचा विचार करण्याची गरज आहे कारण त्या सुविधा देताना लाखो झाडांची आहुती द्यावी लागते.

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले कीजिथे जंगल अधिक तिकडे पाऊस जास्त पडतो. पण अलिकडच्या काळात हे चित्र बदलते आहे .चेरापुंजी नाही तर दुसऱ्या भागात जास्त पाऊस पडत आहेकोकण मराठवाड्यात आपण अशी अतिवृष्टी पहिली आहे.त्यामुळे वन व वन्यजीव संवर्धन हे महत्त्वाचे आहे.

               वन संरक्षक हे वनांचे खरे रक्षक त्यांना आगामी काळात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.

               उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेवन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वनप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. वनांचेवन्यप्राण्याचं महत्व सगळ्यांनाविशेष करुन लहान मुलांनाभावी पिढीला कळावेहा प्रयत्न आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून वनांचंवन्यप्राण्यांचे अस्तित्वजगासाठीमाणसांसाठी किती महत्वाचं आहेहे समजवण्यात आपल्याला यश मिळेलवन्यप्राणी संरक्षणाच्या चळवळीला बळ मिळेलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

         राज्याच्या नागरी भागात 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृक्षांना 'हेरिटेज ट्रीअसे संबोधून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे सांगून

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की ,महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात येत आहे. हेरिटेज ट्री संरक्षणासाठीचा कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

 झाडांसह समस्त प्राणीमात्रांना जगण्यासाठी शुद्ध हवाशुद्ध पाणीशुद्ध अन्नाची आवश्यकता असते. ही मूलभूत गरज आहे. ती फक्त निसर्गातूनपर्यावरणातूच पूर्ण होऊ शकते. त्यासाठी निसर्गाचेपर्यावरणाचं संरक्षण संवर्धन महत्वाचं आहे. म्हणून राज्यात जंगलांचं क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.

भारतीय वातावरणाशी नातं सांगणारी झाडं लावण्याची गरज

         गावशहरशाळामहाविद्यालयांच्या परिसरातरस्त्यांच्या कडेलाओसाड डोंगरावरमोकळ्या माळावरशक्य आहे त्या ठिकाणीआंबावडपिंपळ अशी दीर्घ काळ टिकणारीभारतीय वातावरणाशी नातं सांगणारी झाडे लावली पाहिजेत. पाण्याचे प्रदुषण ही सुद्धा गंभीर समस्या आहे. हे थांबवण्यासाठी जागरुकता आणणं महत्वाचं आहे. नदीओढेविहिरीझरे हे जलस्त्रोतजलप्रवाह प्रदूषणमुक्त ठेवले पाहिजेत. शुद्धस्वच्छमोकळीप्रदूषणमुक्त हवा मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करुया. निसर्गाच्या हानीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनतेला जागरुक करुया. त्याआधी स्वत: जागरुक होऊया. स्वत:ला शिस्त लावून घेऊया असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

             पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणालेराज्यात गेल्या दोन वर्षांपासून वने,हवामान बदल तसेच वन्यजीव संरक्षणासाठी होत असलेल्या प्रयत्नांमुळे जसा शाश्वत विकास अपेक्षित आहे तसा आता होत आहे. मुंबईतील ८०८ एकर आरेचे जंगल शासनाने राखीव वन म्हणून घोषित केले आहे. जगातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असेल. राज्यात ९ हजार ८०० हेक्टर कांदळवन क्षेत्र राखीव वन म्हणून घोषित करण्यात आले आहे.मुंबईतील धारावीमध्येही आगामी काळात कांदळवन घोषित करण्यात येणार आहे. वन रक्षकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याची गरज आहे. प्रदूषण रोखण्याचा उपाय म्हणून तळेगाव येथे इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. जंगलकांदळवन व वन्यजीव यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी शासन कटिबध्द आहे. पर्यावरणाच्या जपणूक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाहीही श्री. ठाकरे यांनी दिली.

             प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) जी.साईप्रकाश म्हणालेवन्यजीव  सप्ताहानिमित्त या पूर्ण आठवड्यात वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाची जनजागृती वाढवणारे वेगवेगळे उपक्रम रावबविण्यात येतील.शाळांमध्ये येत्या वर्षात व महाविद्यालयातील युवकांना वन व वन्यजीव संवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

          प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी म्हणाले, 'वनावर आधारित उपजीविका -मनुष्य आणि सृष्टीचा चिरंतन विकासही  यंदाच्या वन्यजीव सप्ताहाची वर्षाची संकल्पना आहे.येत्या काळात वन विभागातर्फे मानव - वन्यजीव शांततापूर्ण सहजीवनासाठी प्रयत्न करणार असून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे.

        वन्यजीव सप्ताहाची सुरुवात मुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजनाने झाली. पेंच प्रकल्पाच्या लोगोचं अनावरण आणि वाईल्ड महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहितीही यावेळी देण्यात आली.

               कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी केले तर आभार प्रदर्शन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी केले.

 प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवावा

                                      -पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

इलेक्ट्रिक वाहनांच्या कार रॅलीत आदित्य ठाकरे यांनी घेतला सहभाग

 

            मुंबईदि. 2 : मुंबईला स्वच्छ आणि ग्रीन पर्यावरणाची आवश्यकता आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होत असल्याने जनजागृतीच्या उद्देशाने ऑटोकार इंडियाच्या वतीने आज मुंबईत इलेक्ट्रिक कार रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवला तसेच श्री.ठाकरे यांनी स्वतः इलेक्ट्रिक कार चालवून या रॅलीत सहभागही घेतला.

            यावेळी बोलताना श्री.ठाकरे म्हणालेमागील काही वर्षात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात मोठा विकास होतोय. या वाहनांचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा यासाठी ईव्ही धोरणाच्या माध्यमातून शासन विविध उपाययोजना करीत आहे. प्रदूषण कमी करण्यावरही भर देण्यात येत आहे. सर्वच शहरांमधून या वाहनांसाठी चांगला प्रतिसाद मिळत असून चार्जिंग स्थानके वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

            महालक्ष्मी रेसकोर्स पासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मार्गे विक्रोळी या मार्गावर या रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये टाटाटेस्लावोल्वोऑडीजग्वारमर्सिडीजएमजीह्युंडाई अशा विविध कंपन्यांची सुमारे 30 वाहने सहभागी झाली होती. अदानी इलेक्ट्रिसिटी या रॅलीचे प्रायोजक होते.

            यावेळी ऑटोकारचे प्रमुख श्री.सोराबजीअदानी इलेक्ट्रिसिटीचे जी.अदानी तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

Featured post

Lakshvedhi