सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 25 September 2021
नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे
खुली करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
· आरोग्याच्या नियमांचे मात्र काटेकोर पालन व्हावे
मुंबई, दि. 24 : नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.
धार्मिकस्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.
तरल वैद्यकीय प्राणवायू (एलएमओ) उत्पादकांसाठी
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी
· पुढील आदेशापर्यंत क्षमतेच्या ९५ टक्क्यांपर्यंत एल एम ओ साठवून ठेवावं
मुंबई, दि. २४ : कोविड- १९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एल एम ओ) अर्थात तरल वैद्यकीय प्राणवायू कमी पडू नये यासाठी त्याची साठवणूक करून ठेवण्यासंबंधी राज्य शासनाने उत्पादकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
याअनुसार राज्यातील सर्व एल एम ओ उत्पादन करणाऱ्या कंपनी आणि प्राणवायू पुनर्भरण करणाऱ्यांनी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत आपल्या क्षमतेच्या ९५ टक्क्यांपर्यंत साठवणूक करावी आणि पुढील आदेश येईपर्यंत ऑक्सिजन साठ्यासंबंधी अटीचे पालन करावे. यासाठी सर्व उत्पादकांना निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांच्या प्रकल्पामध्ये एल एम ओ उत्पादन पूर्ण क्षमतेने केले जात आहे याकडे लक्ष द्यावे व शहानिशा करून घ्यावी.
जिल्हाधिकाऱ्यांनी खात्री करावी की, जिल्ह्यामध्ये सर्व एल एम ओ उत्पादक साठवणूक (दोन्ही, सार्वजनिक आणि खाजगी) करीत आहे आणि जास्तीत जास्त प्राणवायू साठवणूकीची पातळी टिकून राहील. हे कार्य शक्य तेवढ्या लवकर सुरू करावे असेही निर्देश देण्यात आले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी वाढल्यास अ-वैद्यकीय ऑक्सिजनचा उपयोग योग्य पद्धतीने करावा असेही नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्रामध्ये कोविड -१९ ची दुसरी लाट एप्रिल ते जून २०२१ दरम्यान कायम होती आणि या काळात सात लाख प्रकरणात १८५० मेट्रिक टन ऑक्सिजनाचा उपयोग करण्यात आला. वास्तविकता: हा सर्व वैद्यकीय प्राणवायू महाराष्ट्रामधील उत्पादकांकडूनच उपलब्ध होतो. कोविडची दुसरी लाट चालू असताना असे निदर्शनास आले की, अनेक उत्पादकांकडे ऑक्सिजनचा पुरेसा साठा नव्हता आणि मागणी पूर्ण करण्यात ते कमी पडत होते. या अनुभवाच्या आधारे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीचा भाग म्हणून पुरेसा मेडिकल ऑक्सिजन उपलब्ध व्हावा या दृष्टीने या उपाययोजना केल्या जात आहे.
वरील निर्देशांची अंमलबजावणी करताना राज्य पातळीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त काम पाहतील तर जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी (महानगरपालिका क्षेत्र वगळून) आणि महानगरपालिका कार्यक्षेत्रात संबंधित महानगरपालिका आयुक्त हे सक्षम अधिकारी म्हणून काम पाहतील तसेच या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करतील. या सूचना या आदेशाच्या तारखेपासून लागू असतील आणि पुढील आदेश येईपर्यंत अंमलात असतील.
Andh shradha?
नवीन मूल जन्माला आल्यावर सोयर पाळतात.
- आईला १० दिवस
- इतरांना ३ दिवस
या काळात काय करु नये, करावे?
- देवधरात जाऊ नये.
- देवपूजा करु नये
- देवळात जाऊ नये
- जिथे पूजा/यज्ञ इ. शुभकर्मे चालू असतील अशा ठिकाणी जाऊ नये
- ----------------------------------
सुतक (मृताशौच)
व्यक्ती मृत पावली असता त्या व्यक्तीच्या कोणत्या नातेवाईकास किती दिवस सुतक असते?
१) गर्भपात झाला असता -
आईला - पाचव्या महिन्यात ५ दिवस, सहाव्या महिन्यात ६ दिवस
इतरांना - ३ दिवस
२) मृत निपजल्यास - १० दिवस
३) वडील गेल्यास
- मुलास - १० दिवस
- विवाहित मुलीस - ३ दिवस
४) आई गेल्यास
- मुलास, अविवाहित मुलीस - १० दिवस
- विवाहित मुलीस - ३ दिवस
५) सख्खे/चुलत/चुलत-चुलत - पणजोबा-पणजी, आजोबा-आजी, काका-काकू गेल्यास
- विवाहित मुलास - १० दिवस
- अविवाहित - स्नानाने शुध्दी
- कन्येस - स्नानाने शुध्दी
६) मुलगा/पुतण्या/नातू/पणतू गेल्यास
मृताची मुंज न झाल्यास - ३ दिवस
मृताची मुंज झाल्यास - १० दिवस
७) मुलगी/पुतणी/नात/पणती गेल्यास
मृत अविवाहित असेल तर - ३ दिवस
मृत विवाहित असेल तर - ३ दिवस
८) भाऊ/भावजय गेल्यास -
भावाला - १० दिवस
विवाहित बहिणीस - भाऊ विवाहित असेल तर ३ दिवस
९) बहिण गेल्यास
मृत विवाहित असेल तर भावास - १-१॥ दिवस
विवाहित बहिणीस - ३ दिवस
मृत अविवाहित असेल तर - भावास - ३ दिवस
१०) बायको/नवरा गेल्यास
१० दिवस
११) आत्या मृत झाल्यास
- ३ दिवस
१२) मंत्रोपदेश करणार्या गुरुचे निधन झाल्यास - ३ दिवस🤭🤭🤭🧐🧐🧐
*|| सुविचार ||*
जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर, तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत,
*काहीही आपलं नाही, काही आपलं नव्हतं,*
आणि *काहीही आपलं राहणार नाही...*
[*आयुष्यात समाधान शोधत चला कारण,*
*सुखांची यादी कधी संपतच नाही..*
*सगळी दु:ख दूर झाल्यावर.*
*मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे...*
*मन प्रसन्न करा..सगळी दु:खं दूर होतील...!*
सुप्रभात
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
