Wednesday, 8 September 2021

 किस ऑफ लाईफ !


कालच्या पोस्टवर एकाने विचारलं की आयुष्याची उमेद राहिली नाही तरी जगायचं कशासाठी ?

उत्तर सोपं आहे. 

जगणं आपल्या हाती आहे. मरण आपल्या हाती नाही त्यामुळे जोवर मरण येत नाही तोवर जगण्यावर प्रेम केलं पाहिजे. 


आपण निराशावादी झालो की भवतालही नैराश्याने ग्रासला जातो, सगळं उदास वाटू लागतं. असा माणूस दुसऱ्याच्या आयुष्यात काय रंग भरणार कारण त्याचं स्वतःच्या असण्यावर प्रेम नसतं. 

एक साधा मेसेज सोबतच्या फोटोत दडला आहे.


घटना १९६७ सालची आहे. १७ जुलै १९६७,अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील जॅक्सनविले शहर. 

एका ओव्हरहेड वायरमधून स्पार्किंग होत असल्याने विजेची समस्या उद्भवली तेंव्हा दोन लाईनमन्सवर दुरुस्तीची जबाबदारी सोपवली गेली. 

भर दुपारी त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. 

त्यांचं काम जवळपास उरकत आलं होतं आणि तेव्हढ्यात घात झाला. 


रॅन्डल चॅम्पियन ह्या तरुण लाईनमनकडून अनवधानाने दुसऱ्या एका उच्च दाबाच्या वायरला स्पर्श झाला आणि तो जागेवरच लटकला. त्या क्षणी तो मधल्या वायरवर लटकून काम करत होता आणि त्याच पोलवर त्याचा सहकारी जे. डी. थॉम्पसन हा काम करत होता. 


रॅन्डलला शॉक बसल्याचे निमिषार्धात त्याच्या लक्षात आले, पोलवर पाय ओणवे करून उभं राहत त्यानं त्याला कवेत घेतलं आणि ताबडतोब त्याला तोंडावाटे श्वास देणं सुरू केलं. 


रॅन्डलच्या सर्व हालचाली बंद होत्या, शरीर थिजलं होतं. तो कसलाही प्रतिसाद नव्हता तरीही तातडीच्या सेवेचं वैद्यकीय पथक येईपर्यंत थॉम्पसन अविरतपणे त्याला श्वास देत राहिला. 


एक वेळ अशी आली की दोघंही निळे पडले. 

मात्र थोड्याच वेळात वैद्यकीय पथक आलं. 

अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना खाली उतरवलं नि कमाल झाली !  


वैद्यकीय उपचारानंतर रॅन्डलचा श्वास पूर्ववत झाला. 

रॅन्डल जगला. 


रॅन्डलला जगवण्याचं श्रेय त्याच्या सहकारी मित्राला थॉम्पसनला जाते.


तिथं त्या क्षणी एखादा निराशावादी व्यक्ती असता तर त्यानं प्रयत्नच केले नसते, हाय व्होल्टेज वायरचा शॉक म्हणजे माणूस वाचणार नाही, तो गेलाच असणार म्हणून अश्रू ढाळत बसला असता. 


मात्र थॉम्पसनचं जगण्यावर प्रेम होतं, त्याला मित्राच्या श्वासाची खात्री होती, त्यानं हार मानली नाही. प्रयत्न जारी ठेवले. त्याचीच फलश्रुती म्हणजे रॅन्डलचं जगणं !


छायाचित्रकार रॉको मोरबिटो अग्नीशमनदलाच्या हरेक मोहिमेत जायचे. त्यांनी हे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. 

१९६८ सालचा पुलित्झर हा छायाचित्रणासाठीचा सर्वोच्च पुरस्कार या फोटोने जिंकला होता. 


जॅक्सनविले जर्नलचे संपादक बॉब पॅट यांनी फोटो पब्लिश करताना त्याला नाव दिलं 'किस ऑफ लाईफ' !   

खरेच हा टोटली किस ऑफ लाईफ होता. 


जगण्यावर श्रद्धा असणाऱ्या एका व्यक्तीने मरणाच्या दारावर उभ्या असलेल्या मित्राला प्राण परत मिळवून दिले !


अनेक लोक कमेंटमध्ये वा इनबॉक्समध्ये विचारतात, आता जगण्यात मजा राहिली नाही, सगळं उदास वाटतं आता मी जगून काय करू ? आता जगायचं तरी कुणासाठी हा सूर त्यात असतो. 


अशांना माझं उत्तर एकच असतं - 

"जो स्वतःपुरता जगू लागतो त्याला हे विचार अधिक त्रास देतात. 

त्या उलट माझ्या आयुष्यात काही रंग उरले नाहीत तर मी इतरांचे आयुष्य रंगीत करेन असं ठरवायचं अवकाश की जगण्याची नवी उर्मी मिळते. जगण्यासाठीचं उद्दिष्ट कारण भवतालात डोकावलं तरी मिळतं मात्र त्यासाठी आधी अंतरंगात डोकावलं पाहिजे. 

मग आपणही आशावादी होतो नि आपल्या हातून एखाद्या जीवाचं भलं होऊ शकतं. 

आपलं जगणं सार्थकी लागण्यासाठी इतकं समाधानही पुरेसं ठरते. 

होय ना ?


- समीर गायकवाड.

 गांव की नयी नवेली दुल्हनअपने पति से अंग्रेजी भाषा सीख रही थी, 

लेकिन अभी तक वो "C" अक्षर पर ही अटकी हुई है।


क्योंकि, उसकी समझ में नहीं आ रहा था कि 

"C" को कभी "च" तो 


कभी "क" तो 


कभी "स" क्यूं बोला जाता है।


एक दिन वो अपने पति से बोली, आपको पता है,


"चलचत्ता के चुली भी च्रिचेट खेलते हैं"

पति ने यह सुनकर उसे प्यार से समझाया


यहां "C" को "च" नहीं "क" बोलेंगे।

इसे ऐसे कहेंगे, "कलकत्ता के कुली भी क्रिकेट खेलते हैं।


"पत्नी पुनः बोली "वह कुन्नीलाल कोपड़ा तो केयरमैन है न ?


"पति उसे फिर से समझाते हुए बोला, "यहां "C" को "क" नहीं "च" बोलेंगे।


जैसे, चुन्नी लाल चोपड़ा तो चेयरमैन है न 


थोड़ी देर मौन रहने के बाद पत्नी फिर बोली,"आपका चोट, चैप दोनों चाटन का है न ?


"पति अब थोड़ा झुंझलाते हुए तेज आवाज में बोला, 

अरे तुम समझती क्यूं नहीं, यहां"C" को "च" नहीं "क" बोलेंगे


ऐसे, आपका कोट, कैप दोनों कॉटन का है न


पत्नी फिर बोली - अच्छा बताओ, "कंडीगढ़ में कंबल किनारे कर्क है ?


"अब पति को गुस्सा आ गया और वो बोला, "बेवकुफ यहां "C" को "क" नहीं "च" बोलेंगे। 😡


जैसे - चंडीगढ़ में चंबल किनारे चर्च है न


पत्नी सहमते हुए धीमे स्वर में बोली," 


और वो चरंट लगने से चंडक्टर और च्लर्क मर गए क्या ?


"पति अपना बाल नोचते हुए बोला,"अरी मूरख, यहां

 "C" को "च" नहीं "क" कहेंगे...


करंट लगने से कंडक्टर और क्लर्क मर गए क्या?


इस पर पत्नी धीमे से बोली," अजी आप गुस्सा क्यों हो रहे हो... इधर टीवी पर देखो-देखो...


"केंटीमिटर का केल और किमेंट कितना मजबूत है


"पति अपना पेशेंस खोते हुए जोर से बोला, "अब तुम आगे कुछ और बोलना बंद करो वरना मैं पगला जाऊंगा।"


ये अभी जो तुम बोली यहां "C" को "क" नहीं "स" कहेंगे - 


सेंटीमीटर, सेल और सीमेंट


हां जी, पत्नी बड़बड़ाते बोली, 


"इस "C" से मेरा भी सिर दर्द करने लगा है।


और अब मैं जाकर चेक खाऊंगी, 


उसके बाद चोक पियूँगी फिर 


 चाफी के साथ 


 चैप्सूल खाकर सोऊंगी


 तब जाकर चैन आएगा।😅


उधर जाते-जाते पति भी बड़बड़ाता हुआ बाहर निकला..🙇‍♂


तुम केक खाओ, 

पर मेरा सिर न खाओ..😩


तुम कोक पियो या 

कॉफी, पर मेरा खून न पिओ..


तुम कैप्सूल निगलो, 

पर मेरा चैन न निगलो..😤


इसे देखकर मैंने भी निर्णय कर लिया कि अंग्रेजी में बहुत कमियां है, हम हिदुस्तानी हैं अतः अपनी हिंदी पर गर्व करें।

😀

 *आजाराशी लढावे कसे... ?*




*लेख संपूर्ण वाचा तुम्हाला कुठलाच व्हायरल आजार होणार नाही*

 

आजारपण प्रत्येकालाच कमी जास्त प्रमाणात येतं. काहीवेळा ते किरकोळ प्रमाणात असतं काहीवेळा गंभीर ! 


आजाराची वैद्यकीय व्याख्या खुप व्यापक असली तरी, शरीराला नको असलेला घटक शरीरात शिरुन वाढायला लागला आणि शरीराला गरजेच्या असणा-या क्रियांमध्ये व्यत्यय आणायला लागला, शरीराला त्रास द्यायला लागला तर त्याला आजारपण म्हणावं असं आपण सर्वसामान्य लोक म्हणु शकतो. 


आजारपण कुणालाच नको असतं तरीही ते येतंच...! 


आजारपण येवुच नये, आलंच तर गंभीर रुप धारण करु नये, अगदी अॕडमिट वैगेरे होण्याची वेळ येवु नये यासाठी काही साधे उपाय सांगत आहे. 


*हे उपाय म्हणजे उपचार (Treatment) नव्हेत... Prevention is better than Cure हे जे म्हटलं जातं, त्यातला Prevention चा प्रकार आहे याची नोंद घ्यावी.*


कोणताही आजार टाळायचा असेल तर आपली प्रतिकारशक्ती म्हणजेच Immunity Power  वाढवणं हा त्यावरचा प्रमुख इलाज आहे. 


Immunity Power म्हणजेच प्रतिकारशक्ती प्रबळ असेल तर कोणताही आजार आपल्या जवळ येत नाही. आलाच तरी जास्त हानी पोचवणार नाही. 


आपण हे ऐकत असतो, परंतु प्रतिकारशक्ती म्हणजे नेमकं काय...ती वाढवायची कशी हे मात्र कुणीच नीट सांगत नाही, सांगितलंच तर, सांगितलेलं आपल्याला पाळायला जमेलच असं नाही... 


म्हणुन सर्वसामान्यांना प्रतिकारशक्ती म्हणजे काय, ती वाढवण्यासाठी नेमकं काय करावं हे साध्यासोप्या भाषेत सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न !   


*डाॕ. पी.पी. देवेन, प्रोफेसर, ए.जे.मेडिकल काॕलेज, केरळ यांच्या अभ्यासपुर्ण निष्कर्षांवर आधारीत हा लेख आहे...!* 


*आजारपण का येतं?* 


मघाशी सांगितल्याप्रमाणे शरीराला नको असलेला घटक म्हणजेच शत्रु आपल्या शरीरात शिरला तर सर्वप्रथम तो काय करतो तर आपल्या शरीरात  स्वतःचं सैन्य वाढवतो. 


ज्याचं सैन्य जास्त, तो जिंकणार हे आपल्याला सर्वसाधारणपणे टिव्ही आणि पिक्चरमधल्या लढाया पाहुन माहित आहे. 


शत्रुला उत्तर द्यायचं म्हणुन आपलं शरीरसुद्धा सैन्याची जमवाजमव करायला लागतं. (हां, बरोबर... सासु बोलली की सुन पदर खोचुन तयार व्हायला लागते तस्सं )


आपण बेसावध असतांना अचानक पणे शत्रु पुर्ण शक्तीनिशी शरीरात येतो... 


त्यामुळे आपल्या शरीराला शत्रुशी युद्ध करण्यापुरतं सैनिक जमवायला थोडा तरी वेळ लागणारच की राव... !


आपलं पुरेसं सैन्य जमण्याच्या आधीच शत्रुने जर शरीरावर जोरदार हल्ला केला तर... ? 😔


आपलं सैन्य कमी असल्यामुळे म्हणा बेसावध असल्यामुळे म्हणा किंवा सैन्य जमवण्यात आपला वेळ गेल्यामुळे म्हणा आपला पराभव होणार हे निश्चित ! म्हणजेच आजार होणार हे निश्चित ... साधं आहे ! 


शत्रु येण्याआधीच आपल्या शरीरानं, आपलं भरपुर सैन्य साठवुन ठेवलं असतं, हातात भाले घेवुन आधीच तयार करुन ठेवलं असतं तर... ? 


शत्रु नक्कीच हरला असता ! 


शत्रु शरीरात येण्याआधीच आपल्या शरीरानं आधीच भरपुर सैन्य साठवुन ठेवलेलं असणं म्हणजे आपली *प्रतिकारशक्ती* ! 


हि प्रतिकारशक्ती ज्याची जास्त, त्याची "जीत" होणार हे साधं गणित आता कळायला हरकत नाही !


💁‍♀️शत्रु शरीरात आल्याबरोबर पहिले 48 तास महत्वाचे. 


या 48 तासांत जो जास्त सैन्य निर्माण करेल तो भविष्यात जिंकणार... साधं आहे ना हो ! 


मग, या 48 तासांत आपण आपलं सैन्य शत्रुपेक्षा जास्त प्रमाणात तयार केलं तर ठिक; नाहीतर शत्रु आपलं सैन्य या 48 तासांत वाढवणार... आणि आपल्यावर हल्ला करणार...आणि आपण हरणार ... म्हणजेच आपल्याला आजार होणार ! 


पटलंय ना हितवर...व्हय तरी म्हणा कि राव !!!


*गनिमी कावा*


यावेळी आपण करायचं काय... ?तर आपल्या रक्तातच असलेला महाराजांचा "गनिमी कावा" आता खेळायचा !


आजाराचं कुठलंही लक्षण दिसायला लागलं आपल्याला उदा. घसा खवखवणे, शिंका, नाक गळणे, बारीक ताप येणे इ. कि लगेच सोसेल इतकं गरम पाण्याचे घोट (पाण्याचेच) घ्यायला सुरुवात करायची. 


सोसेल इतकंच बरं का... नायतर घसा घ्याल भाजुन...! 


लक्षण दिसायला लागल्यापासुन दर अर्ध्या तासाने सुरुवातीच्या 48 तासांपर्यंत हे गरम पाणी पीत रहायचं ... ! 


(कोई मिल गया मधल्या बालिश हृतिक रोशन प्रमाणे बालीश चेहरा करुन .... एकावेळेला एक गिलास पिवु का, आर्दा गिलास पिवु ?  हे विचारायला फोन करु नका... ज्यानं त्यानं आपल्याला "झेपतंय" तेव्हढं प्या ! पाणी हां.. इतकावेळ पाण्याचंच बोलतोय मी )


यानं होतं काय... कि आपल्या शरीराचं तापमान वाढायला लागतं.  


यामुळं होतं काय.... तर शरीरात आलेला शत्रु वातावरण बदलल्यामुळे बावचळतो... भांबावतो... मध्येच काय झालं ? असं समजुन स्वतःचं सैन्य निर्माण करायचं जरा वेळ थांबवतो... परिस्थिती बदलेल याची थोडी वाट पाहतो... बेसावध होतो...! *(पक्का कोल्हापुरकर इथं म्हणणार....कसा फशीवला...कसा गंडीवला...! )*


या गनिमी काव्यामुळं, शत्रुचा सैन्य जमवण्याचा वेग बघा मंदावला, पण आपण आपलं सैन्य निर्माण करायचं थांबवलंय का... ? तर नाही... ! (हुषार आहे आपण )


आलं लक्षात ? 


या गनिमी काव्यानं शत्रुला सैन्य वाढवण्यापासुन आपण थांबवलं... आपलं सैन्य मात्र सतत वाढवत गेलो... तर होईल काय... ? 


अर्थात् सुरुवातीच्या 48 तासांत आपल्याकडे शत्रुपेक्षा जास्त सैन्य साठलेलं असेल... आणि त्यामुळं भविष्यात "जीत" आपलीच !


आता आजार गंभीर होणार नाही हे निश्चित ! 


("जीत" हा शब्द सारखा मध्येमध्ये कडमडतो आहे, जिंकणं या अर्थाने तो आलेला आहे. लेखकाच्या नावातील शेवटची दोन अक्षरे घुसडण्याचा यात मुळीच हेतु नाही, कुणाला तसे वाटले तर तो निव्वळ योगायोग समजावा.)


*शस्त्रांची जमवाजमव ...*


चला आपल्याकडे सुरुवातीच्या 48 तासांत सैन्य तर वाढलं. पण नुसतंच सैन्य वाढुन काय कामाचं ? 


त्यांच्या हातात शत्रुबरोबर लढायला हत्यारं नकोत ? 


सैन्याकडे मशीनगन, स्टेनगन, तोफा, रणगाडे नसतील तर नुसतीच सैनिकांची संख्या वाढुन काय कामाचं ? (शाब्दिक भांडणात चार शिव्या दिल्या की झालं. शिवाय यांतुन त्या भांडणाची खुमारीही वाढते...हो... आपापल्या जबाबदारीवर करुन पहा ! )


पण हे शाब्दिक भांडण नव्हे, इथं युद्ध चालु आहे, शिव्या कामाच्या नाहीत... इथं शस्त्रंच लागतात.


आपल्याला सुद्धा आपल्या सैनिकांना ही शस्त्रं  पुरवावी लागतील, तरच आपलं सैन्य युद्ध करु शकेल शत्रुशी... ! 


आपण आता कोणती शस्त्रं द्यायची आपल्या सैन्याच्या हातात ? 


तशी बरीच आहेत... पण 100 टक्के युद्ध जिंकुन देणारी, भरवशाची प्रमुख चार ! 


*1. आयर्न - Iron*


*2. अमायनो अॕसीड - Amino Acid*


*3. क जीवनसत्व - Vitamin C* 


*4. जस्त - Zinc* 


*शस्त्रं मिळवायची कशी... ?*


 सोपं आहे. 


*1. आयर्न - Iron* - 


सफरचंदात हे असतं. परवडतंय त्यांनी रोज सफरचंद खा. इतरांनी मुठभर काळ्या मनुका खा. दोन्ही खाल्लं तर ऊत्तमच ! इकडं पाठवलं तर त्याहुन उत्तम ! 


*2. अमायनो अॕसीड - Amino Acid*


नाव ऐकुन दचकु नका ! फक्त मोड आलेली कडधान्य खा भरपुर ... ! 


*3. क जीवनसत्व - Vitamin C* 


एका लिंबाचा रस काढुन सरबत करुन प्या. संत्रा, मोसंबी पण चालेल. *(हि फळांची नावं आहेत याची नोंद घ्यावी)*🤦‍♂️


*4. जस्त - Zinc* 


ऐकुन गंमत वाटेल, पण पपईच्या बियांत सर्वात जास्त प्रमाणात जस्त असते. 


पपईच्या बिया खाणार नाही तुम्ही  मला माहित आहे (चांगलाच ओळखुन आहे मी तुम्हांला)


ओके ! 


मग इथुन पुढे कलींगड खातांना, तोंडाचा चंबु करुन त्याच्या बिया शिताफीनं थुंकुन टाकायचं बंद करा! त्या चावुन खा...! 


त्यांतही भरपुर जस्त आहे. 


हि चार शस्त्रं जर आपण आपल्या  सैन्याला दिलीत तर "हर हर महादेव" म्हणत आपलं सैन्य शत्रुवर तुटुन पडणार... आणि आपला झेंडा कायम डोलत राहणार... निरोगी !


तेव्हा नेहमीसारखं गाफील राहु नका... ( गाफील या शब्दाचा समानार्थी गोड शब्द म्हणजे धांदरट... ! बायकांचा हा  आवडता शब्द, जणु यांच्या माहेरचाच. 'आमचे हे किनई पयल्यापासुन धांदरटच' हे म्हणण्यात काय त्यांना आसुरी आनंद होतो कळत नाही )


तर, ऐनवेळी धावपळ करण्यापेक्षा, आपलं सैन्य आजपासुनच जमवायला सुरु करा...! 


हुश्श् ...! 


... तुमच्या घरापर्यंत, हि टेक्नीकल माहिती, खाटेवर  उताणं पडल्या पडल्या तुमाला समजावी, कळावी यासाठी   कष्टानं तुमच्यापर्यंत ती पोचवली आहे... !


➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖

*(कॉपी पेस्ट)*

Tuesday, 7 September 2021

 [02/09, 10:45] Mangaon Kadam: अपरिचित रायगडाचा घेरा ( भाग चौथा ) .....


मौजे रायगडवाडी....


प्रत्यक्ष शिवप्रभूंचं वास्तव्य ज्या दुर्गदुर्गेश्वरावर होतं , त्या गडाचा पायथा होण्याचं भाग्य या वाडीला लाभलंय......रायगडासंदर्भातील अर्धेआधिक खलबतं , राजकारण ज्या गावाने पाहिलंय ती हीच वाडी.......अठरा कारखान्यांपैकी काही कारखाने असलेली रायगडाची वाडी....


कोळी आवाड , हिरकणीवाडी,  परडी , टकमकवाडी , नेवाळी , खडकी आणि शिंदे आवाड अशा सात वाड्यांची मिळून रायगडवाडी आहे.......छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही सरदारांचं वास्तव्य देखील याच वाडीत होते......चितदरवाजापासून खाली वाडीकडे उतरल्यानंतर डाव्या बाजूला आज जिथं निलगिरी आणि सुरूची झाडे दिसतात....तीच पूर्वीची राजबाग होती...महाराजांनी ती खास बनवून घेतली होती.....याच राजबागेला लागून पूर्वी काही घरं होती.......वाडीमध्येही बाजारपेठ असल्याचा उल्लेख सापडतो......रायगडावर व्यापारी पेठ वसवणारा नागशेट्टी ( नागराज शेठ ) याचे निवासस्थान सुध्दा वाडीत होते , त्या भागाला ग्रामस्थ " नाग्याबाग " म्हणून ओळखली जाते.....नाग्याबागमध्ये एक पडीक जोते आणि विहीर दिसते.......अत्यंत सुबक चिरेबंदी विहीरीचं पाणी ग्रामस्थ अलीकडच्या काही वर्षांपर्यत वापरत होते......


रस्त्याच्या उजव्या बाजूला " फड" होता , याच फडात गडावर आलेल्या आगंतुकांसाठी विश्रामगृहासारखी सोय होती......इथं पडकी आणि अर्धी बुजलेली घुमटी पण पाहायला मिळते......यालाच " गोसाव्याचा मठ " असे म्हणतात.....छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू मौनीबाबांचे शिष्य तुरतगिरी यांच्यासाठी महाराजांनी मठाची स्थापना केली होती...


रायगडवाडीत आजमितीस साटम , सावंत , खोपकर , जाधव , वाडीकर , राईलकर , कडू , तांबे , हिरवे , लांबरे अशी विविध जातीधर्माची कुटुंब राहतात.... तसं म्हटलं तर बारा बलुतेदारच नांदतात.....मराठा , सोनार , चर्मकार , परीट , बौद्ध, धनगर अशी मिश्र वस्ती आढळते......


वाडीचं ग्रामदैवत झोलाई ......छत्रनिजामपूरमार्गे आल्यानंतर छत्रपती शिवराय झोलाईचं दर्शन घेऊनच गडचढाई करत असत....... अतिशय जागृत देवस्थान आहे ते......याशिवाय श्रीसोमजाई , श्रीवरदायिनी , हनुमान आणि श्री हरेश्वराचं पडीक शिवमंदिर आहे.....जावळीच्या युद्धातून पळून आलेल्या चंद्रराव मोरेंनी रायगडावर जाण्यापूर्वी याच हरेश्वराच्या मंदिरात कौल घेतला , परंतु तो कौल विरोधात गेल्याचेही नोंदीमध्ये उल्लेख  आढळतो....हरेश्वर मंदिरासमोर डांबरी रस्त्यालगत मराठा कालखंडातील काही समाधीशिळा सुध्दा दिसतात......थोडंसं अंतर पुढे चालून गेल्यानंतर " गोदावरीची समाधी " दिसते.....समाधी बोलण्यापेक्षा कुणातरी महत्वाच्या स्त्रीचं ते वृंदावन आहे....शंभर  वर्षांपासून भलेभले इतिहासकार संशोधन करून गेले , पण आजतागायत कुणीही त्या " वृंदावनाचं " रहस्य आणि कथा उलगडू शकले नाहीत......प्रत्यक्ष रायगडावर देखील  इतकं सुबक बांधकाम केलेलं वृंदावन नाही,  मग इथेच कसं ?.....रायगडवाडीत घडलेल्या त्या प्रसंगाचा काळच साक्षीदार ......आपण बापुडे काय बोलावे ?.......


अशीच एक कथा इथल्या " रायनाक" बद्दल सुध्दा......मे 1818 मध्ये पोटल्याच्या डोंगरावरून तोफा डागणार्या ब्रिटिशांना मदत केलेल्या रायनाकाला " फितुर " ठरवलं गेलं , पुन्हा त्याच निर्दयी इंग्रजांनी कडेलोटाचं बक्षिस दिलं आणि जिथं रायनाकाचा देह पडला तिथं स्मारक बनवलं गेलं......शिवरायांचे गडकोट , मेटे सांभाळणारी रायनाकाची जमात निष्ठावंत आणि विश्वासू असूनही फितुरीचा शिक्का माथी मारला गेला......


वाडीमध्ये " ब्राह्मणवाडा " कुंभारबाव अजूनही त्याच नावाने ओळखल्या जातात...हवालदाराचं घर , कारखानीसाच्या घराची जोती अजूनही खाणाखुणा सांभाळून आहेत.....वाडीपासून बाहेर पडल्यानंतर गडाच्या किंचितशा चढणीवर काही थडगी दिसतात....चाळीस वर्षे रायगड किल्ला जंजिरेकर सिद्दीकडे होता.....सिद्दी अंबर , खैर्यतखान यांच्याकडून पेशव्यांनी गड जिंकला....रायगड आणि रायगडवाडी ताब्यात असताना , सिद्दीच्या सैनिकांची ती थडगी असावीत असा एक तर्क करता येतो.....


काळ आणि गांधारीच्या मधोमध वसलेल्या , टकमक टोकाचा उत्तुंग कडा शतकानुशतके पाहत असलेली ही वाडी म्हणजे स्वराज्याची दौलतच .......


शब्दांकन - रामजी कदम 

माणगाव रायगड

[02/09, 10:45] Mangaon Kadam: अपरिचित रायगडाचा घेरा ( भाग तिसरा ) 


छत्रपती शिवरायांच्या खासगी अंगरक्षक बाजी कदमांचं " कोंझर "......


राजधानी रायगडाचा पहिला टप्पा कोंझरपासून सुरू होतो....कोंझर हे शिवकालीन महत्वाचं लष्करी ठाणं......पाचाडमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष नेहमीच असल्याने सैन्याचा तळ इथेच पडत असे......


छत्रपती शिवरायांनी गोवेलेकर सावंतांना स्वराज्यकार्यात आणले आणि याच कोंझरची चौकी त्यांच्याकडे सोपवली......आजच्या कोंझर गावात शिरताना भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाजवळ ही चौकी असल्याचे उल्लेख सापडतात......गावात भवानीमातेचं मंदिर आणि ग्रामदैवत वाघजाई देवीचं देऊळही आहे.....


सरदार बाजी सूर्याजी कदम हे याच कोंझर गावचे .....छत्रपती शिवाजी महाराजांच्या  अंतिम निर्वाणाच्या वेळी राजवाड्यातील दालनात जी मोजकीच तीन चार मुत्सद्दी मंडळी होती त्यात बाजी कदम उपस्थित  असल्याची नोंद आढळते......यावरून छत्रपती शिवरायांचे अतिशय विश्वासू अंगरक्षक म्हणून बाजी कदमांचं कर्तृत्व कळतं......महाराजांच्या महापरिनिर्वाणानंतर 1689 मध्ये रायगडाला वेढा पडला असताना , छत्रपती राजाराम महाराजांना वाघ दरवाज्यातून खाली उतरवून , थेट जिंजीपर्यत ज्यांनी साथसोबत केली ते हेच बाजी सूर्याजी कदम.......परमुलुखातून शत्रूला हुलकावणी देत देत , वेशांतर करून जीवावर उदार होत आमच्या गादीच्या वारसाला सुखरूपस्थळी पोहोचवणारे शूर बाजींचे स्मरण आजही इथले कदम वंशज करतात........पण नाही चिरा , नाही स्मारक ..... 


कोंझरमध्ये कदम , देवगिरीकर , पवार , भद्रिके , जाधव, घोलप , महाडीक अशा उपनामांची कुटुंबं राहतात......ब्रिटिश काळातही इथल्या स्वातंत्र्यसैनिकांनी गावाचं नाव केलं होतं....सुरबा नाना टिपणीसांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात कोंझरमधल्या अनेकांनी सहभाग घेतला होता......पारतंत्र्यातील हिंदुस्थानातून ब्रिटिशांना " चलेजाव " चा इशारा दिला गेला ....देशभक्तीचे बाळकडू उपजतच असलेल्या कोंझरवासीयांनी यात उडी घेतली......तुकाराम परशुराम कदम , सिताराम शंभू महाडीक,  बाळू हबाजी घोलप , रघुनाथ परशुराम पवार आणि यांचं नेतृत्व करणारे विष्णुपंत केरू खातू यांनी सक्रिय सहभाग घेतला.....महाडजवळच्या खिंडीत सत्याग्रहींची धरपकड सुरू झाली .....तत्कालीन इंग्रज सरकारने यांना तुरूंगात डांबले .....महाराजांच्या मावळ्यांनी देशासाठी हालअपेष्टा सोसल्या.....आणि आज महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीत कोंझर गावचे हे पाच पांडव समाविष्ट झालेले दिसून येतात.......


कोंझर गावात आजही काही जुनी पडीक जोती दिसतात......काळाच्या ओघात गावपण हरवलं असलं तरी या शिवकालीन खेड्यात गेल्यानंतर ठायी ठायी इतिहास बोलू लागतो......गांधारी नदीच्या काठावर वसलेल्या या कोंझरमध्ये सरदार बाजी सूर्याजी कदमांचं स्मारक होणं उचित ठरेल.....थोरल्या महाराजांची सावली बनून राहिलेल्या बाजींचा इतिहास अजूनही दुर्लक्षित राहिलाय.....


गाव विकासाच्या वाटेवर असून , शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेलं आहे.....राजमाता जिजाऊ विद्यालय कोंझर ह्या ज्ञानमंदिरातून अनेक विद्यार्थी घडले.......वसंत तुकाराम कदम , विठ्ठल रामचंद्र कदम , संभे गुरूजी , नागे गुरूजी यांच्यासारख्या दूरदृष्टी लाभलेल्यांनी शिक्षणाचा पाया रचला .....तर द्वारकानाथ घोलप , शंकर भद्रिके यांच्यासारख्या ज्ञानयोग्यांनी कळस चढवण्याचं काम केलंय...... कोंझरमधील सुशिक्षित , सुसंस्कृत पिढी हे त्याच कार्याचं फलित दिसून येतंय......


माजी सभापती संजय चिखले , माजी सरपंच निलेश देवगिरकर यांच्यासारख्या राजकीय जाण असलेल्या नेत्यांमुळे विकासगंगा गावात पोहोचलेली दिसते......


छत्रपती शिवरायांचा निष्ठावंत मावळा बाजी सूर्याजी कदमांच्या स्मृती जागवत असलेले हे कोंझर म्हणजे शिवकालीन इतिहासाचे कोंदणच जणू.......


शब्दांकन - रामजी कदम 

माणगाव- रायगड

 नमस्कार 


आज श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस...पिठोरी अमावस्या. 

तसेच मातृत्वाचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे पिठोरी अमावस्या. श्रावण अमावास्येला पिठोरी अमावास्या म्हणतात. चौसष्ट योगिनी या व्रताच्या देवता आहेत.


 पिठोरी अमावस्येचंच दुसरं नाव मातृ दिन. वंशवृद्धी तसेच मुलांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा केली जाते. स्त्रीला सौभाग्य व तिच्या मुलांना दीर्घायुष्य, आरोग्य देणारी ही अमावस्या आहे.


ज्या स्त्रियांची मुले अल्पायुषी ठरतात किंवा ज्यांची मुले जगत नाहीत अशा फक्त सुवासिनी स्त्रिया पिठोरीचे व्रत ठेवतात. या दिवशी दिवसभर उपास करुन संध्याकाळी चौसष्ट योगिनींची पूजा करतात. पूर्वी पिठाच्या मूर्ती करायचे परंतु आता यांच्या चित्राच्या कागदाची पूजा केली जाते. या दिवशी नैवेद्याला सर्व पिठाचेच पदार्थ करतात,म्हणून या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. बेदाणे घातलेली भाताची खीर हा खास नैवेद्य असतो.


घरातील मुलांसाठी खीरपुरीचे किंवा पुरणपोळीचे जेवण तयार केलं करतात. पूजा करुन झाल्यावर पु्रणाची आरती केली जाते आणि खिरीच्या वाटीवर पुरी झाकून आई ते पक्क्वान आपल्या खांद्यावरुन मागे नेत विचारते, “अतीत कोण?” (किंवा अतिथी कोण?) तेव्हा घरातील मुले आपले नाव सांगुन नैवेद्य हातातून घेतात व अशा प्रकारे पूजा पूर्ण होते.


या दिवशी स्त्रिया पूजा करुन सौभाग्य व तिच्या मुलांना दीर्घायुष्य व आरोग्य मिळावं अशी प्रार्थना करतात. म्हणून स्त्रीला संतान सुख देणारी अमावस्या मातृदिन म्हणून ओळखली जाते. श्रावण वद्य अमावास्येलाच *दर्भग्रहणी* अमावस्या ही म्हणतात.


आपल्या संस्कृतीमध्ये आईला फार महत्व आहे कारण माता केवळ मुलांचीच नव्हे तर *त्यांच्या संस्कारांचीही जननी* आहे. वात्सल्याने भरलेल्या आईची तुलना देवाशी केली जाते. तिला देवतेऐवढे स्थान असल्यामुळेच प्रेमाने माऊली अशी हाक दिले जाते. त्याग, सेवा, समर्पण, प्रेमाची मूर्ती म्हणून मातृदिन उत्साहाने साजरा केला जातो.


तसेच शेतकऱ्यांसाठी हा सण महत्वाचा असतो....बैलपोळा , त्याच्या कुटुंबाचा घटक म्हणून, त्याचे मित्र म्हणून, सहकारी म्हणून वावरणाऱ्या 'जिवा-शिवाच्या' बैलजोडीला विश्रांती देण्याचा दिवस, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. बैलांना आंघोळ घालायची, शिंगांना रंग द्यायचा, सजवायचे, अंगावर झुल चढवायची आणि सायंकाळी सवाद्य मिरवणूक...गाव त्यानिमित्ताने एकत्र येतो. 


आता तयारी करायची   "बाप्पा" च्या आगमनाची. 

🙏🙏🙏

 भीड़ को आमंत्रित करने वाले सभी राजनीतिकधार्मिक आयोजनों को स्थगित करने के लिए

मुख्यमंत्री ने प्रदेश के सभी दलों व संगठनों से की अपील

·       जनता का स्वास्थ्य जरूरीत्योहार बाद भी मनाएं जा सकते हैं

·       कोरोना संक्रमण के बढ़ने से बिगड़ सकती हैं हालात

 

            मुंबईदि. 6 :  कोरोना संक्रमण में थोड़ी वृद्धि होती दिख रही है और पिछली लहर के अनुभव को देखते हुए मैं सभी राजनीतिक दलों और संगठनों से आग्रह करता हूं कि वे भीड़-भाड़ वाले राजनीतिक कार्यक्रमोंसभामोर्चों को तुरंत स्थगित कर दें। आप अन्य कार्यक्रमों को कठोर नियमों के दायरे में रहकर मना सकते हैं। लेकिन अब हमें तीसरी लहर नहीं आने देनी है। लोगों के स्वास्थ्य को प्राथमिकता दें‌। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने एक बार फिर यह अपील की है।

            राज्य के मुख्यमंत्री के तौर पर सरकार को इस संकट का सामना करने के लिए पूरी तरह तैयार रहने के स्पष्ट निर्देश दिए ही गए हैं। लेकिन मैं सत्ता और विपक्ष दोनों पार्टियों से अपील कर रहा हूं कि अब और सावधान रहें। भीड़भाड़ वाले आयोजनों से बचें। त्योहारउत्सव आ गए हैं,  उस पर कौन प्रतिबंध लगाना चाहेगालेकिन अंत में आपका स्वास्थ्यआपका जीवन मायने रखता है।  त्योहार बाद भी मना सकते हैं। इसलिए फिर से सख्त प्रतिबंध लगाने का समय नहीं आएगा।

            मुख्यमंत्री श्री ठाकरे ने आगे कहा कि 'इसे खोलोउसे खोलो की मांग ठीक हैलेकिन इससे खतरा बढ़ गया है। यदि सभी लोग नियमों और सीमाओं का पालन करते हैंतो फिर से सख्त प्रतिबंध लगाने का समय नहीं आएगा। इसलिए मैं सभी राजनीतिक दलों से विनम्रतापूर्वक अपील करता हूं कि हम सभी को समझदारी से काम लेना चाहिए और लोगों के जीवन की रक्षा करनी चाहिए। त्योहारउत्सव  तो आज नहीं तो कल आएंगे लेकिन घर के सभी सदस्य हमारे लिए महत्वपूर्ण हैं। यदि लोगों के जीवन के व्यवधान से बचाना हैतो सरकार द्वारा समय-समय पर निर्धारित स्वास्थ्य नियमों का कड़ाई से पालन करेंभीड़भाड़ न करें। सार्वजनिक आयोजनों से बचें। राजनीतिक सभाओंसम्मेलनों को प्रोत्साहित न करेंयही विघ्नहर्ता श्री गणेश की इच्छा होगी।

0000


बाढ़ पीड़ितोंकिसानों और बधितों को फिर से

खड़ा करने के लिए सर्वतोपरी प्रयास जारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       बाढ़ को लेकर स्थायी उपाययोजनाओं के भी प्रयास 

·       ‘स्वाभिमानी’ के किसान शिष्टमंडल के साथ हुई बैठक

            मुंबईदि. 6 : - राज्य में भारी बारिश के कारण बाधित हुये बाढ़ पीड़ित किसानों को वर्ष 2019 के नियमों के अनुसार मदद देने का निर्णय इसके पहले ही लिया है। इस निर्णय का क्रियान्वयन और केंद्र सरकार की ओर से बाढ़ पीड़ितों को दी जानेवाली एनडीआरएफ की मदद के नियमों में वृद्धि की जाएइसके लिए विविध स्तर पर पहल हो रही है। इसके अलावा बाढ़ के हालात न बनेइसे लेकर भी स्थायी उपाययोजनाएं करने के संदर्भ में विशेषज्ञों से और यंत्रणा से समन्वय साधा जा रहा हैयह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा। बाढ़ पीड़ितों कोकिसानोंबधितों को फिर से खड़ा करने के लिए सर्वतोपरी प्रयास किए जाएंगेयह ग्वाही भी उन्होंने में दी।

         इस बैठक में पश्चिम महाराष्ट्र में जुलाई माह में निर्माण हुए बाढ़ के हालातबाढ़ पीड़ितों को नुकसान के मुआवजे और उनका पुनर्वसन को लेकर श्री. शेट्टी और सांसद श्री. माने ने मुख्यमंत्री के समक्ष अपनी बात रखी।  जिस पर मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने कहा कि जुलाई माह में अचानक आयी बाढ़ की वजह से किसानों का बड़े पैमाने पर नुकसान हुआ है। ऐसे किसानों को खरीप हंगाम की फसलों को लिए पीक कर्ज का पुनर्गठन करने को लेकर रिझर्व बैंक से चर्चा की जाएगी। साथ ही रोजगार हमी के माध्यम से इस परिसर में कामों को प्राथमिकता भी दी जाएगी। बाढ़ की अवधि में बढ़नेवाले बॅकवॉटर की वजह निर्माण होनेवाली बाढ़ के हालातों को लेकर जलसंपदा मंत्री जयंत पाटिल ने कर्नाटकआंध्रप्रदेश इन राज्यों से साथ इस विषय पर संवाद समन्वय साधा है।  इसके अलावा तालाबों के बॅकवॉटर को लेकर योग्य वह खबरदारी लेने की उपाययोजना भी जारी है और बाढ़ बाधित  क्षेत्र के लोगों का योग्य पुनर्वसन होइसके लिए भी प्रयास जारी है। इस पुनर्वसन नीति को लेकर सहयोग की अपील भी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने इस दौरान किया। 

0000


"POSTPONE SOCIO-POLITICAL-RELIGIOUS CONGREGATIONS FOR NOW, ON PAIN OF PUBLIC HEALTH DISRUPTION. DON'T INVITE THIRD COVID-19 WAVE": MAHA CM'S HEARTFELT APPEAL TO POLITICAL PARTIES, RELIGIOUS ORGANIZATIONS

"DON'T WORSEN CORONA INFECTIONS RATE AT PUBLIC HEALTH COST. WE'LL ALL CELEBRATE FESTIVALS LATER, ":CHIEF MINISTER UDDHAV THACKERAY

 

      MUMBAI September 6, 2021: Maharashtra Chief Minister Shri Uddhav Thakre reached out to the organisers of religious, and political events again today and urged them to immediately put off any plans of holding public congregations, Morchas and other public gatherings in the wake of a marginally higher incidence of covid-19 infections being reported in the state. 

      "I request all political parties and religious organisations to immediately defer any such programs that induce crowding by people. Even permissible functions may only be held provided covid protocols are observed diligently. Today we must accord first priority to the health of the people and ensure that the third wave of the pandemic does not reach our shores, " the Chief Minister reiterated through a heart felt appeal.

      Mr. Uddhav Thakre added that as political head of the state, while strict instructions were already in place to ensure full preparedness to face the ongoing covid-19 pandemic challenges,  it was also incumbent upon not only the ruling parties but also opposition political formations to take the necessary additional precautions, in the wake of of the changing dynamics of the pandemic. "The season of festivals has also arrived and no one wants to put a dampner on such celebrations as they bind together the social fabric of society. But, finally it is a question of public health and the first priority must be accorded to saving lives.  Festivals can be celebrated even later," the Chief Minister said. 

So stringent lockdown does don't have to be reimposed:

      The Chief Minister further stated that it was one thing to raise demands for opening up of this (facility) and that but, this effectively resulted in an increasing threat of the covid-19 footprint's growth.  "If each and every one observed covid-19 protocols, then stringent curbs and restrictions would not be needed to be put in force. Hence I appeal to all political formations to exhibit wisdom and act wisely in the primary interest of maintaining good public health.  Even if we are unable to celebrate festivals today they will return again in the future but, it is of utmost priority to preserve and maintain the good health of our family members who are irreplaceable to us," Mr. Thackeray noted.

       If we have to avoid negative disruptions of public health, it is essential for all to observe stringently the various public advisories and health protocols issued from time to time by the state government.  Prevent crowding, avoid public gatherings, meetings and conferences.  Even Lord Ganesha, the 'Vignaharta' (resolver of all problems of the universe) would wish for us all to behave covid appropriately today," the Chief Minister said. 

0000

 पायाभूत निधी योजनेतून अल्पदरात कर्ज द्यावे

कृषीमंत्री दादाजी भुसे यांची केंद्र सरकारकडे मागणी

 

            मुंबईदि. 6 : शेतीसाठीच्या पायाभूत निधी योजनेतून शेतकऱ्यांना अतिशय अल्पदरातएक ते दोन टक्के दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने योजना सुरु करावी. ही योजना स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात शेतकऱ्यांसाठी अनोखी भेट असेलअसे राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज सांगितले.

            केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत सीएम कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कॉन्फरन्समध्ये सहभागी होताना श्री. भुसे यांनी ही मागणी केली. या कॉन्फरन्समध्ये नवी दिल्लीतून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमरकेंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयलकृषी राज्यमंत्री कैलाश चौधरीविविध राज्याचे मुख्यमंत्रीकृषीमंत्रीकृषी सचिव आणि विविध अधिकारी सहभागी झाले होते.

            कृषीमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले कीनाबार्डच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. हे कर्ज एक किंवा दोन टक्के दराने उपलब्ध करुन द्यावे. असे केल्यास स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात शेतकऱ्यांना मोलाची भेट ठरेल. पायाभुत सुविधांचा विकास करणेशेतीच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही योजना राबवण्यावर भर द्यावा.

           सध्या विविध राष्ट्रीयकृत बँकांचे एकमेकांत विलीनीकरण होत आहे. त्यामुळे बँकांच्या शाखांचे आयएफएससी बदलत आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान निधी योजनेचे पैसे जमा होण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे यावर तोडगा काढला जावाअशी सूचना श्री. भुसे यांनी केली.

            महाराष्ट्र शासनानेही कृषीसाठीच्या अनेक योजना ऑनलाईन केल्या आहेत. विविध योजनांसाठी एकच अर्ज करावा लागत आहे. महाराष्ट्र शासन कृषी क्षेत्रात ई-गव्हर्नन्स प्रोजेक्ट राबवत आहे. त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करावाअशी मागणी श्री. भुसे यांनी केली.

             केंद्र सरकारने तेल बियांच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्याचा निर्णय घेतला आहे. या पावलावर पाऊल ठेवत राज्य शासनाने करडईकारळेजवस या तेलबियांचे उत्पादन वाढावे यासाठी पीक पद्धतीत काही बदल सुचवले आहेत. तेलबियांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतकरी या पिकाकडे वळावा यासाठी बी-बियाणे यांना अनुदान द्यायला हवाअसे श्री. भुसे यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi