गोदावरी नदीकाठच्या पूरप्रवण गावांच्या पुनर्वसनासाठी सुधारित प्रस्ताव सादर करा
- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
मुंबई, दि. १ : गोदावरी नदीकाठच्या पूरप्रवण गावांतील नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या धोरणानुसार आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत शासनाकडे सादर करावेत, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले.
गोदावरी नदीकाठच्या पूरप्रवण गावांच्या पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विधानसभा सदस्य विजयसिंह पंडित, हिकमत उढाण, राजेश विटेकर, विभागीय आयुक्त, तसेच बीड, परभणी आणि जालना जिल्हा अधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment