Monday, 20 July 2026

चालकांचे हित, प्रवाशांची सुरक्षितता आणि स्थानिक युवकांना रोजगार या तीन महत्त्वाच्या उद्दिष्टांचा समतोल

 परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, महाराष्ट्रात व्यवसाय करू इच्छिणाऱ्या कोणत्याही ॲग्रीगेटर कंपनीने राज्य शासनाच्या नियमावलीचे काटेकोर पालन करणे अपरिहार्य आहे. शासनाचा महसूल वाढविणारे, प्रवाशांचा विश्वास दृढ करणारे, चालकांचे हित जपणारे, स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारे आणि भाडे व्यवस्थेत पारदर्शकता आणणारे हे धोरण राज्याच्या वाहतूक क्षेत्रात सकारात्मक आणि दूरगामी बदल घडवून आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

"चालकांचे हित, प्रवाशांची सुरक्षितता आणि स्थानिक युवकांना रोजगार या तीन महत्त्वाच्या उद्दिष्टांचा समतोल साधत महाराष्ट्रात सुरक्षित, जबाबदार, आधुनिक आणि शाश्वत ॲग्रीगेटर सेवा व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने हे धोरण एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे," असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi