Saturday, 18 July 2026

बियाणे, खते व कीटकनाशकसंदर्भात तक्रारींचे सात दिवसांत होणार निराकरण

 बियाणे, खते व कीटकनाशकसंदर्भात तक्रारींचे सात दिवसांत होणार निराकरण

- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

 

तालुकास्तरीय तक्रार निवारण समितींची फेरररचना

 

मुंबई, दि. 18 : शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व कीटकनाशके उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून याबाबत आलेल्या तक्रारींचे जलद व पारदर्शक पद्धतीने निराकरण करण्यासही प्राथमिकता आहे. यासाठी तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पुढील सात दिवसांच्या आत प्रत्यक्ष शेतावर जाऊन तपासणी करून अहवाल अंतिम करण्यात येणार आहे, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

कृषी मंत्री श्री. भरणे म्हणाले, खरीप हंगामात बियाण्यांच्या उगवण क्षमतेसह खते आणि कीटकनाशकांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा तक्रारींचे तातडीने आणि प्रभावीपणे निराकरण व्हावे, यासाठी शासनाने तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची सुधारित रचना लागू केली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi