Thursday, 16 July 2026

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शालेय स्तरापासून कौशल्य शिक्षणाला विशेष

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शालेय स्तरापासून कौशल्य शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. भविष्यात कौशल्याचे महत्त्व अधिक वाढणार असून, राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक युवक-युवतीपर्यंत, विशेषतः आदिवासी व दुर्गम भागातील तरुणांपर्यंत आधुनिक कौशल्य प्रशिक्षण पोहोचविणे ही काळाची गरज आहे. भारतीय युवकांनी आपल्या गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या बळावर जगभरात विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे त्यांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधींसाठी सक्षम बनविण्याच्या दिशेने शासन उद्योग, प्रशिक्षण संस्था आणि विविध भागीदारांच्या सहकार्याने सातत्याने कार्यरत आहे. महाराष्ट्राला अधिक कौशल्यसंपन्न राज्य बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान द्यावे."

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi