Monday, 13 July 2026

स्टार्टअप चळवळ प्रत्येक गावापर्यंत पोहचवणार-

 स्टार्टअप चळवळ प्रत्येक गावापर्यंत पोहचवणार- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, स्टार्टअप चळवळ ही केवळ काही शहरांपुरती किंवा विशिष्ट वर्गापुरती मर्यादित न राहता ती राज्यातील प्रत्येक गावापर्यंत, विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागापर्यंत पोहोचली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्टार्टअप संस्कृती रुजविण्याचे काम सुरू असून, त्यासाठी उद्योग, शैक्षणिक संस्था, गुंतवणूकदार आणि समाजाच्या सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक आहे.महाराष्ट्राला देशातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील आघाडीचे स्टार्टअप केंद्र बनविण्यासाठी ही चळवळ घराघरात पोहोचविण्याचा शासनाचा निर्धार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi