शाश्वत शेतीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक
राज्य शासन शाश्वत शेतीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. पीक कर्जमाफीसोबतच सिंचन प्रकल्प, जलसंचय, कोल्ड स्टोरेज, मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठ जोडणी यासाठी राज्याने हजारो कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुढील काही वर्षांत या गुंतवणुकीचा प्रत्यक्ष परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर दिसेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. यासोबतच उच्च दर्जाची बियाणे, आधुनिक शेती तंत्रज्ञान, ड्रिप आणि स्प्रिंकलरसारख्या पाणी बचत पद्धती, तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे थेट बाजारपेठेशी जोडणी यासाठी स्वतंत्र योजनांमधून अनुदान दिले जात आहे. देशाची अन्नसुरक्षा आणि आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी कृषी क्षेत्रात सतत गुंतवणूक करणे ही राज्य शासनाची प्राथमिकता आहे असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment