वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन
नशामुक्त मुंबई अभियान हा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम न ठेवता प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात विद्यार्थी सुरक्षा समितीच्या माध्यमातून नशामुक्त मुंबई करण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करावे. वरळी डोम येथील मुख्य कार्यक्रमासाठी येणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या उपस्थितीचे योग्य नियोजन करावे. यामध्ये प्रामुख्याने सातवीच्या पुढील शालेय तसेच महाविद्यालयांच्या आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना सहभागी करुन घ्यावे. या अभियानाला व्यापक स्वरूप देण्यासाठी व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, मानसोपचारतज्ज्ञ, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसीच्या विद्यार्थ्यांना या मोहिमेत सामावून घेतले जावे. इतर विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांमधून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
No comments:
Post a Comment