यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले की योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कोणतीही आर्थिक मागणी न करता पूर्णपणे मोफत व दर्जेदार उपचार मिळणे ही सर्व संबंधित यंत्रणांची सामूहिक जबाबदारी आहे. कोणत्याही परिस्थितीत पात्र रुग्णाला उपचार नाकारले जाणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक असून योजनेची प्रभावी आणि काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती पावले उचलावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
आरोग्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, रुग्णांना योजनेंतर्गत सेवा मिळवून देण्यासाठी आरोग्यमित्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे आरोग्यमित्रांची नियुक्ती, प्रशिक्षण आणि क्षमता विकास यावर विशेष भर देणे गरजेचे आहे. रुग्णांना योजनांचा लाभ सहज आणि वेळेत मिळण्यासाठी आरोग्यमित्रांनी अधिक संवेदनशीलतेने कार्य करावे.
No comments:
Post a Comment