लग्नपत्रिकांवर वधू-वरांची जन्मतारीख नमूद करणे सक्तीचे
बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकांवर वधू-वरांची जन्मतारीख नमूद करणे सक्तीचे करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या महिलांच्या वयाचा आधार कार्ड हा पुरावा ग्राह्य न धरता जन्मतारखे दाखला वैध मानण्याबाबत आवश्यक प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष डॉ. संजय पुराणिक यांनी विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. यामध्ये बालस्नेही पंचायत, मानस प्रकल्प, बाल रक्षा अभियान, सखी सावित्री समिती सक्षमीकरण, चिराग ॲप, डिजिटल सुरक्षा उपक्रम, बालस्नेही पोलिस स्टेशन, पोक्सो कायद्यांतर्गत सपोर्ट पर्सन नियुक्ती तसेच बार्टी, शबरी, सारथी, महाज्योती आणि मौलाना आझाद मंडळ यांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा समावेश होता.
याशिवाय बालगृहांमधील कनिष्ठ काळजीवाहकांचे प्रशिक्षण, बालकांच्या संरक्षणासाठी यंत्रणांचे सक्षमीकरण आणि राज्य बाल हक्क आयोगाच्या भविष्यातील दृष्टीकोनाबाबतही माहिती देण्यात आली.
मंत्री आदिती तटकरे यांनी बालकांच्या हक्कांचे संरक्षण, मानसिक आरोग्य संवर्धन आणि सुरक्षित बालपणासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.
No comments:
Post a Comment