नागपूर संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा प्रकल्प आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. संरक्षण क्षेत्रात भारताची वाढती ताकद जगभरात मान्य होत असून केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देश जागतिक संरक्षण उत्पादन निर्यातदार म्हणून उदयास येत आहे. या अत्याधुनिक प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होईल. विदर्भात विशेषतः नागपूरचा परिसर हा ‘डिफेंस मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टिम’मध्ये देशाचे एक महत्वाचे अंग म्हणून विकसित होत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
आत्मनिर्भरतेकडे देशाने एक सक्षम पाऊल टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत असे दोन मंत्र आपल्याला दिले आहेत. विकसित भारताकडे वाटचाल करायची असल्यास आत्मनिर्भर भारत विकसित होणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या देशाने आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल सुरू केली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
आज संपूर्ण जग आपल्या देशाची प्रगती पाहून आश्चर्यचकित झाले आहे. भारताने संरक्षण क्षेत्रात अत्यंत कमी वेळात प्रगती केली असून संरक्षण क्षेत्रातील एक महत्वाचा उत्पादक देश झाला आहे. विशेषतः ऑपरेशन सिंदूरमध्ये साऱ्या जगाने देशाची सामरिक क्षमता पाहिली आहे. हा नवा भारत असून पूर्ण क्षमतेने व आत्मनिर्भरतेने उभा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यंत्र इंडिया लिमिटेडचे सीएमडी विजय कुमार अय्यर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमादरम्यान अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेसची माहिती देणारी ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे आभार अंबाझरी आयुध निर्माणीचे कार्यकारी संचालक अजयकुमार येरपुडे यांनी मानले.
0000
No comments:
Post a Comment