येत्या पाच वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पक्के घर देणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- पुढील वर्षी 15 लाख बेघरांना चाव्या सुपुर्द करणार
- जून अखेर शेतकऱ्यांना कर्ज माफी ; नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन अनुदान
- 12.35 पैसे दराने कांदा खरेदी सुरु
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गतच्या पाच लाख घरांचे लोकार्पण
सातारा दि. 15 : महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले असून, हा देशातील आतापर्यंतचा उच्चांक आहे. घरांसाठी नऊ हजार कोटी मिळाले आहेत. 30 लाख घरांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत अत्यंत गतीने काम करत पाच लाख बेघर लोकांना घरांच्या चाव्या सुपुर्द करत आहोत. पुढील वर्षी 15 लाख लोकांना चाव्या सुपुर्द करु. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना पक्की घरे या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अहोरात्र काम करुन येत्या पाच वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पक्के घर देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली
No comments:
Post a Comment