परभणी व लातूर जिल्ह्यातील पीक विम्याचा सुधारित प्रस्ताव पाठवावा
-कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि. १३: परभणी व लातूर जिल्ह्यातील ज्या मंडळ परिसरातील पीक विम्याबाबत शेतक-यांच्या तक्रारी प्राप्त आहेत त्यांचा सुधारित प्रस्ताव केंद्राला पाठवून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
परभणी व लातूर जिल्ह्यातील शेतक-यांच्या पीक विमा वाटपातील तक्रारीबाबत आयोजित बैठकीत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी आमदार राजेश विटेकर,आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार संजय बनसोडे, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषि आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक कृषी विनय कुमार आवटे, जिल्हाधिकारी परभणी रघुनाथ गावडे हे व्हीसीव्दारे उपस्थित होते.
मंत्री श्री.भरणे म्हणाले की, परभणी व लातुर जिल्हयातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पीक विमा वाटपातील तक्रारीबाबत सर्व बाबींची तपासणी विमा कंपन्या,स्थानिक क्षेत्रीय अधिकारी तसेच कृषि विभागाने करून केंद्राला सुधारित प्रस्ताव पाठवावा. प्रस्तावात त्रुटी न ठेवता विहित कालावधीत प्रस्ताव सादर करण्याची खबरदारी विभागाने घ्यावी
No comments:
Post a Comment