ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना २४ तासांत तारण कर्ज;
महाराष्ट्र देशातील पहिले राज्य
- मंत्री जयकुमार रावल
· राज्याची साठवणूक क्षमताही वाढवणार
· शेतकऱ्यांनी साठवलेला शेतमाल "डिजिटल" विक्री सुविधाही उपलब्ध होणार
मुंबई, दि. २० : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आणि राज्य सहकारी पणन महासंघाच्या माध्यमातून राज्यात साठवणूक क्षमता वाढवण्यात येत आहे. समृद्धी महामार्गालगत तसेच इतर ठिकाणी अॅग्रो लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येत असून शेतकरी-केंद्रित डिजिटल साठवणूक व्यवस्था निर्माण करण्याला वेग देण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांनी गोदामात साठवणूक केलेल्या शेतमालावर ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून गोदाम पावती नुसार ऑनलाईन तारण कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. असे जलद गतीने तारण कर्ज उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून त्याचा शेतकऱ्यांनी अधिक लाभ घ्यावा, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment