आयोगाच्या वेळापत्रकानुसार, २० जून ते २९ जून २०२६ या काळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण होईल, त्यानंतर ३० जूनपासून प्रत्यक्ष घरोघरी भेटी देऊन पडताळणी करण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. ही मोहीम २९ जुलैपर्यंत असणार आहे.
राज्यातील मतदारांसाठी ५ ऑगस्ट २०२६ ही तारीख महत्त्वाची ठरणार आहे, कारण याच दिवशी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. यानंतर ४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना आपल्या नावातील दुरुस्ती, पत्ता बदल किंवा नवीन नाव नोंदणीसाठी दावे आणि हरकती सादर करता येतील. सर्व हरकतींचा निपटारा केल्यानंतर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे.
निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर आपले प्रतिनिधी नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि सर्वसमावेशक होईल. या मोहिमेमुळे आगामी निवडणुकांसाठी राज्याकडे एक त्रुटी मुक्त आणि अद्ययावत मतदार डेटाबेस उपलब्ध होणार आहे. पहिल्या दोन टप्प्यांत देशातील ५९ कोटी मतदारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि पंजाब यांसारख्या मोठ्या राज्यांमध्ये कामाला वेग येणार आहे.
0
No comments:
Post a Comment