Saturday, 9 May 2026

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार फळे व भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणार

 शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार फळे व भाजीपाल्यात

 भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणार

                            -पणन मंत्री जयकुमार रावल

 

·         फळेभाजीपाला व इतर शेतमाल भेसळखोर पणन च्या रडारवर

 

मुंबईदि.८: राज्यातील शेतकरी दर्जेदार फळेभाजीपाला तसेच इतर शेतमालाचे उत्पादन करतात. मात्रकाही ठिकाणी फळांची गोडी वाढविण्यासाठीकृत्रिमरित्या पिकविण्यासाठी किंवा अधिक आकर्षक दिसण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत. अशा प्रकारे भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

 

यासंदर्भात कृषि उत्पन्न बाजार समित्याखाजगी बाजार समित्या तसेच थेट पणन व्यवस्थेद्वारे होणाऱ्या शेतमाल खरेदी-विक्रीमध्ये भेसळ आणि घातक रासायनिक प्रक्रियांना आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार पणन संचालनालयाने राज्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्याखाजगी बाजार समित्या आणि थेट पणन परवाना धारकांना महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi