समृद्ध महाराष्ट्र’साठी शिक्षण, कौशल्यविकास आणि सीएसआर उपक्रमांची सांगड आवश्यक
· ग्रामीण भागापर्यंत डिजिटल शिक्षण आणि रोजगाराच्या संधी पोहोचविण्यावर भर
मुंबई, दि. २० : राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये शाश्वत रोजगारनिर्मिती आणि कौशल्याधारित विकासाला गती देण्यावर भर देण्यात आला आहे. उद्योग-शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य, भविष्योन्मुख कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल शिक्षण, महिला व युवक सक्षमीकरण, ग्रामीण भागातील विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण प्रणाली यांसारख्या विषयांवर या चर्चेत सखोल मंथन झाले. मुंबई, पुणे आणि नाशिकपुरता विकास मर्यादित न राहता गडचिरोली, भामरागड यांसारख्या दुर्गम भागांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे, यावर‘टेक महाइम्पॅक्ट 2026’ परिषदेत सर्व वक्त्यांनी मत व्यक्त केले.
No comments:
Post a Comment