फेब्रुवारी २०२३ मध्ये सामंजस्य कराराद्वारे या प्रकल्पाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. बालसंगोपन संस्थांमध्ये राहणाऱ्या अनेक मुलांना त्याग, आघात, शोषण किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. अशा मुलांच्या भावनिक व मानसिक गरजा ओळखून त्यांना योग्य वेळी सहाय्य मिळावे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
प्रारंभी महाराष्ट्रातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या जिल्ह्यांमध्ये मर्यादित स्वरूपात राबविण्यात आलेला हा प्रकल्प आता राज्य शासनाने निश्चित केलेल्या १२१ बालसंगोपन संस्थांपर्यंत विस्तारण्यात येत आहे. या संस्थांमध्ये दोन प्रमुख गटांतील मुले राहतात, एक म्हणजे संकटग्रस्त मुले, जसे अनाथ, मानव तस्करीतून मुक्त केलेली मुले किंवा कुटुंबाकडून काळजी घेणे शक्य नसलेली मुले; आणि दुसरा गट म्हणजे कायद्याच्या संघर्षात आलेली मुले, जी न्यायप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निरीक्षण गृहात ठेवली जातात.
No comments:
Post a Comment