देशभरातून येणाऱ्या भाविकांनी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी. आरोग्य सेवा व्यवस्थापनासाठी विविध स्तरांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने व्यापक तयारी करण्याचे निर्देशही आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.
कुंभमेळ्याच्या दरम्यान रोगराईचा प्रसार रोखण्यासाठी नाशिक, त्र्यंबक, रामकुंड, सीतामंडी व इतर सर्व धार्मिक स्थळावरील स्वच्छतेवर विशेष भर द्यावा. पाण्याच्या स्रोतांची तपासणी करावी. ‘आरोग्य रक्षक किट’ व पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
No comments:
Post a Comment