Wednesday, 22 April 2026

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काही भागांत पारंपरिक पद्धतीने अल्पवयीन बालकांचे विवाह लावण्याची प्रथा

 अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काही भागांत पारंपरिक पद्धतीने अल्पवयीन बालकांचे विवाह लावण्याची प्रथा अद्यापही आढळून येते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बाल विवाह मुक्त भारत या १०० दिवसांच्या अभियानांतर्गत व्यापक जनजागृतीसमन्वय आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून यंत्रणा अधिक सजग केली आहे.

 

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की,  प्रकरण व्यवस्थापनकुटुंबाचा सातत्याने पाठपुरावातसेच शिक्षणकौशल्य विकाससमुपदेशन आणि पोषण सेवांशी समन्वय साधण्याचे काम या अभियानामार्फत राबविण्यात आले  होते.  यामध्ये कोकण विभाग (रायगड) – २ बालविवाह, पुणे विभाग (पालघर) – नाशिक विभाग – सांगली (१)नाशिक (२)अहिल्यानगर (५)छत्रपती संभाजीनगर विभाग – परभणी (१)लातूर (१)बीड (३)हिंगोली (१)धाराशिव (२)संभाजीनगर (४)बुलडाणा (१)अमरावती विभाग – अकोला (४)नागपूर विभाग – यवतमाळ (२)चंद्रपूर (२) असे एकूण ३२ बालविवाह रोखण्यात यश मिळाले.

 

बालविवाह हा केवळ कायद्याचा भंग नसून बालकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे. बालविवाह रोखण्याबरोबरच संबंधित बालिकांच्या पुनर्वसनशिक्षण आणि संरक्षणासाठीही ठोस पावले विभागामार्फत उचलली जात आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पालक व मध्यस्थांवर कारवाई सुरू असूनयापुढेही अशा घटना घडू नये यासाठी कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.

 

या अभियानाच्या अनुषंगाने विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत जिल्हाधिकारीतज्ज्ञ प्रतिनिधी तसेच राज्यातील सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीजिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि चाइल्ड हेल्पलाइन प्रतिनिधी सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi