Wednesday, 22 April 2026

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ३२ बालविवाह रोखले

  

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ३२ बालविवाह रोखले

-मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

  • बालविवाह मुक्त अभियानात राज्य देशात आघाडीवर
  • महिला व बाल विकास विभागाच्या स्पेशल फोर्सची राज्यव्यापी धडक कारवाई

 

मुंबईदि. २१ : राज्यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभागाने स्पेशल फोर्सच्या माध्यमातून मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ३२ बालविवाह रोखण्यात यश मिळवले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे  यांनी दिली.

 

बाल विवाह प्रतिबंध अधिनियम२००६ नुसार १८ वर्षांखालील मुलगी व २१ वर्षांखालील मुलाचा विवाह लावणे हा दंडनीय गुन्हा असूनबाल विवाह मुक्त राज्य बनविण्यासाठी महिला व बालविकास विभाग बाल विवाह मुक्त भारत हे अभियान राबवित असूनअतिशय कडक कारवाई करत राज्य देशात आघाडीवर आहे.

 

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काही भागांत पारंपरिक पद्धतीने अल्पवयीन बालकांचे विवाह लावण्याची प्रथा अद्यापही आढळून येते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बाल विवाह मुक्त भारत या १०० दिवसांच्या अभियानांतर्गत व्यापक जनजागृतीसमन्वय आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून यंत्रणा अधिक सजग केली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi