रस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी असलेली “पीएम-राहत" योजना प्रभावीपणे राबवा
सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
अपघातग्रस्तांना तात्काळ दीड (1.50) लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचाराचा दिलासा
मुंबई, दि. 26: रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या नागरिकांना तातडीने दीड (1.50) लाख रुपया पर्यंतचे उपचार पूर्णतः निशुल्क (cashless) उपलब्ध करून देण्या-या “पीएम-राहत” योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत राज्य आरोग्य हमी सोसायटीची भुमिका महत्वाची आहे. रूग्णाला “गोल्डन अवर” मध्ये तातडीचे उपचार देवून मृत्यूदर कमी करण्यास कटिबद्ध रहावे असे आवाहन, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात आयोजित जनआरोग्य योजनेच्या बैठकीत केले .
No comments:
Post a Comment