२०२८ पर्यंत जलजीवनच्या सर्व योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
कोकणातील पाच जिल्ह्यांत जलजीवन मिशनअंतर्गत ७,०६० योजना राबवल्या जात असून यापैकी २,९७३ योजना पूर्ण झाल्या असून १,३६४ योजना ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. एकूण ८,५६८ कोटींच्या योजनांपैकी ३,८८२ कोटींचा खर्च झाला असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
कोरोना काळात काही कामे थांबली असली तरी केंद्राशी समन्वय साधून निधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २०२८ पर्यंत सर्व योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ग्रामीण भागात शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment