Wednesday, 11 March 2026

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही शासनाची धोरणात्मक योजना आहे या योजनेत

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीमुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही शासनाची धोरणात्मक योजना आहे या योजनेत ४००० मेगावॅटचे काम पूर्ण झाले आहे. यातून सध्या ८ लाख शेतक-यांना  निरंतर वीज देत आहोत या वर्षाच्या अखेरीर्यंत अतिरिक्त १० हजार मेगावॅटचे काम पूर्ण होईल ७५ टक्के शेतक-यांना आपण दिवसा वीज देऊ शकू. मागेल त्याला सौर कृषि पंप योजनेची खूप लोकप्रियता आहे. या योजनेची दखल आता जागतिक स्तरावर घेतली जात आहे. 'इंटरनॅशनल सोलर अलायन्स'ने (आयएसए) महाराष्ट्राच्या या योजनेला 'फ्लॅगशिप योजनाम्हणून मान्यता दिली असूनया कार्यासाठी राज्याला सात ते आठ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. केंद्र सरकारने देखील इतर राज्यांना महाराष्ट्राच्या या मॉडेलचे अनुकरण करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना दिवसा १० तास अखंडित वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. या योजनेचा पुढचा टप्पा म्हणून आता 'बॅटरी स्टोरेज'वर भर दिला जाणार आहे असेही ते म्हणाले.

या प्रश्नाच्या चर्चेत आमदार नाना पटोले यांनी सहभाग घेतला.        

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi