राज्यात अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून ‘अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आली आहे. ही यंत्रणा केवळ ड्रगविरोधी कारवाईवर लक्ष केंद्रित करणार असून संबंधित कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर योजना आणि बढतीसाठी विशेष तरतूद करण्याचा विचार सुरू असल्याचे श्री. कदम यांनी स्पष्ट केले.
एनडीपीएस कायद्याअंतर्गत कडक कारवाई केली जात असून, मोठ्या प्रमाणातील (कमर्शियल क्वांटिटी) गुन्ह्यांमध्ये अधिक कठोर तरतुदींचा वापर केला जात आहे. मागील दीड वर्षांत राज्यात अमली पदार्थांशी संबंधित गुन्हे दाखल करण्यात लक्षणीय वाढ झाली असून, सुमारे १७,५०० पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही संख्या पूर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment