कुंभमेळ्याच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा, निवास व्यवस्था आणि सुरक्षितता यांचा विचार करून सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी करावी. कामे वेळेत पूर्ण होणे जितके आवश्यक आहे, तितकेच ती दर्जेदार आणि टिकाऊ असणेही महत्त्वाचे आहे.
कुंभमेळ्याच्या भव्यदिव्य आयोजनासाठी सर्व विभागानी आपआपसात समन्वय ठेवून, सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरेल, अशा पद्धतीने कामे पूर्ण करावीत, असे निर्देश मंत्री श्री महाजन यांनी यावेळी दिले.
No comments:
Post a Comment