मुरबाड तालुक्यातील काळू नदीवर उभारण्यात येणाऱ्या या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर तसेच परिसरातील अनेक शहरांना भविष्यात मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करता येणार आहे. ठाणे जिल्हा आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता हा प्रकल्प दीर्घकालीन जलसुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे कोणतीही दिरंगाई न करता प्रकल्पाला गती देण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री महाजन यांनी यावेळी दिले.
००००
No comments:
Post a Comment