बिहार येथील लोक महाराष्ट्रासह देशाच्या विभिन्न राज्यांमध्ये योगदान देत आहेत. मूळचे बिहार येथील अधिकारी आज अनेक राज्यात भारतीय प्रशासकीय सेवा व भारतीय पोलीस सेवेच्या माध्यमातून योगदान देत आहेत. बिहारी लोक देशाच्या सर्व भागात आहेत. त्रिपुरासह देशाच्या उत्तर पूर्व राज्यात देखील बिहारी जनता वसली असून तेथेही 'छट पूजा' साजरी केली जाते, आज बिहार समृद्ध इतिहासाची भविष्यातील विकासाची सांगड घालत आहे.
भारत हा केवळ सीमा, सैन्य व परराष्ट्र धोरण असलेला देश नसून भारत हे संस्कृती व ज्ञान परंपरा असलेले राष्ट्र आहे. देशातील राज्याराज्यांमध्ये विविधता असली तरीही देशात एकात्मतेचा विचार सखोल रुजला आहे असे राज्यपालांनी सांगितले.
No comments:
Post a Comment