Wednesday, 25 March 2026

राज्यातील वाढत्या आर्थिक सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तक्रार तत्काळ नोंदवणे अत्यंत

 श्री. कदम म्हणाले कीराज्यातील वाढत्या आर्थिक सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तक्रार तत्काळ नोंदवणे अत्यंत गरजेचे असून गोल्डन अवरचा योग्य वापर केल्यास मोठे नुकसान टाळता येऊ शकते. सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झाल्यानंतर अनेकदा उशिरा तक्रार दाखल केली जाते. त्यामुळे आरोपींना पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये व देशाबाहेर वळविण्याची संधी मिळते. काही प्रकरणांत अवघ्या अर्ध्या तासात रक्कम २५० ते ३०० खात्यांमध्ये विभागली जाते. त्यामुळे तात्काळ तक्रार करणे गरजेचे आहे. सायबर गुन्हेगार सतत नवे तंत्र वापरत असून डिजिटल अरेस्टसारख्या पद्धतींनी लोकांची फसवणूक केली जात आहे. काही वेळा अल्पशिक्षित व्यक्तीदेखील इंटरनेटच्या मदतीने हॅकिंगसारखे गुन्हे करत असल्याने हे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi