भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
राज्यात भारतीय न्याय संहितेची प्रभावी अंमलबजावणी होत असून महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ई-साक्ष प्रणालीचा वापर 28 टक्क्यांवरुन वरून 84 टक्क्यांपर्यंत वाढला असून 60 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण 2-3 टक्क्यांवरुन वरून 46% पर्यंत पोहाचले आहे. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांत 60 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण जवळपास 89 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. दोषसिद्धीच्या दरामध्ये 78 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे न्यायप्रक्रियेला वेग मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment