एआय च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन
एससीईआरटीने एआयच्या माध्यमातून इयत्ता दुसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेचे आणि एकूण प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी निपुण महाराष्ट्र उपक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण प्रयोग राबवले आहेत. विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करून शिक्षक व प्रशासनाला त्वरित निर्णय घेणे सुलभ झाले आहे. डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रातही परिषदेने लक्षणीय प्रगती केली असून एकूण 152 पैकी 135.5 गुण मिळवत उच्च कामगिरी नोंदवली आहे. ई-ऑफिस प्रणालीत 100 टक्के अंमलबजावणी करत 96.94 टक्के फाइल्स निकाली काढण्यात आल्या आहेत. सर्व 92 कर्मचारी ई-ऑफिसवर सक्रिय असून कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान झाले आहे.
No comments:
Post a Comment