Friday, 13 March 2026

नियम व अटी पूर्ण केल्यासच गुंठेवारी प्रस्तावांना मंजुरी

 नियम व अटी पूर्ण केल्यासच गुंठेवारी प्रस्तावांना मंजुरी

-          मंत्री डॉ. उदय सामंत

 

मुंबईदि. १३ : गुंठेवारी नियमितीकरणासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटींची पूर्तता करणे आवश्यक असून संबंधित निकष पूर्ण करणाऱ्या प्रस्तावांनाच मंजुरी दिली जाते. आवश्यक कागदपत्रे व तांत्रिक अटी पूर्ण न झाल्यास संबंधित प्रस्ताव नाकारले जातात. त्यामुळे गुंठेवारी विकास नियमित करण्यासाठी सर्व निकषांची पूर्तता करणे गरजेचे असल्याचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.

नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चेत सदस्य योगेश टिळेकर यांनी याबाबत सूचना उपस्थित केली होती. यावेळी चर्चेत सदस्य प्रविण दरेकर यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi