राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर, पालघर आदी भागांतील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आढळत असल्याचे त्यांनी सांगितले. औद्योगिक सांडपाणी, शहरी घाण, तसेच शेतीतील रसायने पावसाच्या पाण्यासोबत नद्यांमध्ये मिसळत असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. नद्यांच्या प्रश्नावर विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने प्रभावी काम होत नाही. यासाठी स्वतंत्र ‘नदी पुनर्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याचा प्रस्तावाची मान्यता अंतिम टप्प्यावर आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
औद्योगिक व सांडपाण्याच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करून ठराविक कालमर्यादेत नदी स्वच्छतेसाठी कृती आराखडा राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment