आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांचा समन्वय साधून एकात्मिक आरोग्य व्यवस्था विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. फार्मसी क्षेत्रातील नवीन संशोधन, डॉक्टरांचे संशोधन पेपर आणि नवकल्पनांचे सादरीकरणही परिषदेत होणार आहे. या माध्यमातून राज्याच्या मेडिकल टूरिझम आणि वेलनेस पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. ही परिषद केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता ठोस निर्णय, गुंतवणूक करार आणि धोरणात्मक बदल घडवून आणणारे व्यासपीठ ठरेल. त्यामुळे राज्यातील आरोग्य सेवा अधिक आधुनिक, परिणामकारक आणि सर्वसमावेशक होऊन ग्रामीण भागातही दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला.
०००
No comments:
Post a Comment