माझी वसुंधरा अभियानातील स्पर्धेचा शनिवारी मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा
- पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे
राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार विजेत्यांचा गौरव
मुंबई, दि. १९ :- पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६ रोजी डोम वरळी, मुंबई येथे दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी राज्य शासनाने राबविलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाने राज्यात व्यापक जनसहभागातून उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येणारा हा पहिलाच एकात्मिक आणि अभिनव उपक्रम असून २ ऑक्टोबर २०२० पासून तो मिशन मोड पद्धतीने सुरू आहे.
पर्यावरण क्षेत्रात पदाधिकाऱ्यांना काम करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ व ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ चा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा सन्मान सोहळा राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार विजेत्यांचा गौरव शानिवार,२१ फेब्रुवारी, २०२६ रोजी डोम वरळी, मुंबई येथे दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला आहे. पर्यावरण क्षेत्रात पदाधिकाऱ्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे आणि स्थानिक स्तरावर पर्यावरण चळवळ अधिक बळकट व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment