Sunday, 22 February 2026

शाश्वत व्यवसायासाठी एआयचा संदर्भ महत्त्वाचा

 शाश्वत व्यवसायासाठी एआयचा संदर्भ महत्त्वाचा

कोणताही कृषी व्यवसाय शाश्वत आणि ‘युनिट इकॉनॉमिक्स’दृष्ट्या व्यवहार्य असणे गरजेचे आहे. मोठ्या भांडवली गुंतवणुकीची गरज असलेल्या सेवांसाठी शासनाची भूमिका महत्वाची ठरत असल्याचे अॅक्यूमनचे सहयोगी संचालक (पोर्टफोलिओ) पराग सभलोक यांनी यावेळी सांगितले. भारत सरकारने ॲग्रीस्टॅक (AgriStack) आणि विस्टा (VISTA) सारख्या पायाभूत प्रणाली उभारून दूरदृष्टी दाखवली आहे. आता मत्स्यव्यवसायफळभाज्या आणि सुका मेवा यासारख्या उच्च-मूल्य पिकांवर भर दिला जात आहे. एआय ही जादूची काठी नसूनयोग्य संदर्भ आणि विद्यमान प्रणालीत छोटे पण प्रभावी बदल करून वापरल्यास त्याचे खरे फायदे मिळू शकतात. भविष्यात उपग्रह प्रतिमाजमीन नकाशांकन आणि पीक नोंद यासारख्या क्षेत्रात एआयमुळे स्टार्टअप्सना अधिक संधी उपलब्ध होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi