एआयच्या यशासाठी धोरणात्मक संरचना आणि अर्थकारण महत्त्वाचे
तंत्रज्ञान, निधी आणि इच्छाशक्ती सोबतच अंमलबजावणीसाठी सक्षम प्रशासनिक रचना आवश्यक असल्याचे नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक संजीव डी. रोहिल्ला यांनी यावेळी सांगितले. देशात डेटा अभावाचा प्रश्न नाही. कृषी विद्यापीठे आणि विस्तार यंत्रणा यामुळे मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध आहे. एआय ही केवळ त्या डेटावर आधारित पूरक प्रणाली आहे. मात्र एआयचा खरा उपयोग स्थानिक गरजा ओळखून त्यानुसार उपाय देण्यात होत आहे. एआय आणि कृषी सुधारणा हे व्यापक आर्थिक वास्तव आणि अर्थकारणाच्या चौकटीत पाहणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment