महाराष्ट्राला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, समुद्रातून वाहून येणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. त्याचबरोबर नद्यांमधील प्रदूषण हीदेखील चिंतेची बाब असून, भारतीय संस्कृतीत नद्यांचे पवित्र स्थान लक्षात घेता त्यांच्या स्वच्छतेसाठी राज्य शासन विशेष कार्यक्रम हाती घेणार आहे, असे मंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राज्यपाल यामागुची यांनी जपानकडील तांत्रिक ज्ञान, व्यवस्थापन अनुभव आणि संशोधन क्षमता महाराष्ट्रासोबत सामायिक करण्याची तयारी दर्शवली. आशियाई समुद्रातील प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी “ज्ञान भागीदारी”च्या माध्यमातून संयुक्त उपक्रम राबविण्याबाबत दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिकेवर यावेळी चर्चा झाली.
No comments:
Post a Comment