Wednesday, 12 November 2025

तंत्रज्ञानाच्या नव्या युगात – ‘एआय’चा वाढता प्रभाव

 तंत्रज्ञानाच्या नव्या युगात – ‘एआय’चा वाढता प्रभाव

- कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी

 

 मुंबई, दि. ११ : ‘एआय’ म्हणजे केवळ संगणकाचा वापर नव्हेतर मानवी मेंदूच्या विचारसरणीचे तंत्रज्ञानरूप आहे. ‘एआय’ चा वापर कौशल्यपूर्ण केला तर अधिक सुलभपणे काम करता येऊ शकते, असे मत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी यांनी व्यक्त केले.

 मंत्रालय येथे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयात वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल प्रसार माध्यमांसाठी चार दिवसीय कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेत  'डिजिटल कन्टेंट क्रिएशन इन द एज जनरेटिव्ह एआयया विषयावर कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी बोलत होते. यावेळी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकरमंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दिपक भातुसे यासह पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi