ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, करमाळा तालुक्यात सिंचनासाठी पाणी उपलब्धता कमी असून जल नियोजनानुसार 5.28 टीएमसी पाणी उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहेत. सद्यस्थितीमध्ये जास्तीत जास्त पाणी यादृष्टीने विभागाने काम करावे. उजनी धरणातील पाणी वाटप नियोजन यापूर्वीच निश्चित झालेले असून त्याऐवजी डिंभे धरणातून माणिकडोह मध्ये पाणी उपलब्ध करून देता येईल, यासह इतर पर्याय तपासून तातडीने कार्यवाही करावी. या दृष्टीने सर्वेक्षण करून अभ्यासपूर्ण अहवाल सादर करण्यात यावा, 45 दिवसात कार्यवाही केली जावी.
बैठकीमध्ये आमदार आबा पाटील आणि सरपंच अंकुश शिंदे , मदन पाटील, रश्मी बागल यांनी यासंदर्भातील माहिती दिली. या भागास सिंचनासाठी पाणी मिळावे या दृष्टीने विभागाच्या वतीने तयार केलेल्या नियोजनावर तसेच वॉपकॉस संस्थेचा अहवाल याबाबतही बैठकीत चर्चा झाली. करमाळा तालुक्यातील 23 हजार 704 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी या उपाययोजना
No comments:
Post a Comment