पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसमुळे प्रवासाचे नवीन पर्व--उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मुंबईकरांसाठी 'बेस्ट'आणि लोकल रेल्वे हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. नागरिकांना चांगला प्रवास मिळावा यासाठी साडेतीन हजार कोटी रुपये निधी तरतूद केली आहे. एकेकाळी ट्राम व बग्गी धावलेल्या मुंबई शहरातील रस्त्यांवर आता या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बस धावणार आहे, प्रवासाचे हे नवीन पर्व सुरू आहे. ताफ्यात समाविष्ट झालेल्यामध्ये नियमित लांब बसेसबरोबर मिडी बसेस देखील आहेत. ज्या वर्दळीच्या रस्त्यावर सहजगतीने मार्गक्रमण करतील.
मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक नागरिक येत असतात, शहरातील सुविधा वाढविण्यासाठी लक्ष दिले जात आहे.
शासनाच्या कामाचा झपाटा मोठा असून शहराला कोस्टल रोड, अटल सेतू , मेट्रो यासह काँक्रीट रस्ते, पूल अशा जलद आणि उत्तम दळणवळण सुविधा देण्यात येत आहेत. असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
ते म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेताना दिवाळीपूर्वीच बेस्ट कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांइतका बोनस दिला आहे. शासन कर्मचाऱ्यांसाठी हिताचे काम करते असून मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी सफाई कर्मचारी अविश्रांत काम करीत असतात, ते खरे मुंबईचे हिरो आहेत. या सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांचे भविष्य चांगले व्हावे यासाठी देखील निर्णय घेतले आहेत. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी निधी उपलब्ध करणारी योजना लागू केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली
No comments:
Post a Comment