Monday, 20 October 2025

*आयुष्यातील १९ उंटांची गोष्ट*

 *आयुष्यातील १९ उंटांची गोष्ट*


*एका गावात एका व्यक्तीकडे १९ उंट होते.*


*एके दिवशी ती व्यक्ती मरण पावली.*


*त्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र वाचण्यात आले.*


*ज्यामध्ये असे लिहिले होते की..*


 *माझ्या १९ उंटांपैकी अर्धा हिस्सा माझ्या मुलाला, १९ उंटांपैकी एक चतुर्थांश हिस्सा माझ्या मुलीला आणि १९ उंटांपैकी पाचवा हिस्सा माझ्या नोकराला द्यावा.*


 *अर्थात ही वाटणी कशी व्हायची असा सर्वांचाच गोंधळ उडाला.*


 *१९ उंटापैंकी अर्धा हिस्सा करायचा म्हणजे एक उंट कापावा लागेल.* 


*त्यात एक कट झाला म्हणजे १८ बाकी राहीले.* 


*त्यापैकी त्यात चतुर्थांश हिस्सा करायचा म्हणजे साडेचार होतात मग?*


 *सगळेच खूप गोंधळले होते.* 


*तेवढ्यात शेजारच्या गावातून एका शहाण्याला बोलावण्यात आले.*


*तो शहाणा त्याच्या उंटावर बसुन आला.*


*समस्या ऐकून घेतली. थोडा विचार केला.*


*मग म्हणाला ठिक आहे या १९ उंटांमध्ये माझा आणखी हा एक उंट मिसळा आणि वाटून द्या.*


 *प्रत्येकाला वाटले की एक निघाला मरणासन्न वेडा! जो असे मृत्युपत्र तयार करून निघून गेला आणि आता हा दुसरा वेडा निघाला आहे.*


*तो म्हणतो की, त्यात अजून एक माझा उंट त्यांच्यामध्ये वाटून द्या.*


*तरीही मुद्दा मान्य करण्यात काय हरकत आहे. नुकसान तर नाही.*


*असा विचार करून सर्वांनी वाटणी करायचा निर्णय घेतला.*


 *आता एकूण उंट १९+१=२० झाले.*


 *२० उंटापैकी अर्धे मुलाला दिले.*


*उरले १० उंट.*

 *२० उंटापैकी एक चतुर्थांश  हिस्सा मुलीला म्हणजे ५ उंट तिला दिले.*

 

 *२० उंटापैकी पाचवा हिस्सा म्हणजे ४ उंट नोकराला दिले.*

*असे एकूण १०+५+४=१९ होतात.*


*त्यात एक उंट वाचला. वाचलेला उंट जो ज्ञानी माणसाचा होता. तो त्याला परत देऊन टाकला व तो त्याच्या गावी घेऊन निघून गेला.*


 *अशा प्रकारे १ उंट मिसळल्या नंतर काय झाले तर त्यामुळे उरलेल्या १९ उंटाना सुख, शांती, समाधान आणि आनंदाने राहता आले.* 


 *त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या आयुष्यातही १९ उंट आहेत.*

 *५-ज्ञानेंद्रिये.*

 *(डोळा, नाक, जीभ, कान, त्वचा)*


 *५ कर्मेद्रिंये.*

 *(हात, पाय, जीभ, मूत्रमार्ग, गुद्द्वार)*


 *५ पंचप्राण.*

*(व्यान, समान, अपान, उदाम व प्राण )*


 *आणि...*


*४-अंतःकरण चतुष्टय.*

 *(मन, बुद्धी, चित्त, अहंकार)*


 *असे एकूण १९ उंट आहेत.*


*माणूस आयुष्यभर या १९ उंटांच्या वाटणीत अडकून राहतो.*


*आता त्यात अडकून न राहाता फक्त त्यात  "मित्र" रुपी उंट त्यात जोडा.! अर्थात आयुष्यात चांगला, इमानदार व सच्चा "मित्र" रूपी उंट सोबत ठेवा.*


*जोपर्यंत मित्र रुपी उंट आपुल्या आयुष्यात जोडत नाही. तोपर्यंत आपलेच नातेवाईक आपल्याला सुख, शांती, समाधान आणि आनंद हे मिळवून देणारच नाहीत.*🙏


*♦️वाचण्यात आलेला सुंदर लेख♦️*


●┈┉❀꧁꧂❀┉┈●

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi