नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताच्या उड्डाणाला नवीन गती - केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री किंजरापु राममोहन नायडू
नवी मुंबई ही नवीन आशा आणि उत्साहाचे प्रतीक आहे. जागतिक दर्जाच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताच्या उड्डाणाला नवीन गती मिळाली आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांनी केले.
2014 नंतर मुंबई विमानतळावर प्रवासी वाहतुकीत मोठी वाढ झाली असून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या 190 वरून 260 वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी नवी मुंबई विमानतळ नव्या संधींचे दार उघडणार आहे. अंदाजे ₹100 अब्ज गुंतवणुकीत उभारण्यात आलेले हे विमानतळ 30 हजार एकर क्षेत्रात पसरले असून सुमारे 2 लाख तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करेल. सार्वजनिक-खासगी भागीदारीचे हे एक आदर्श उदाहरण ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment