Sunday, 19 October 2025

आत्मसमर्पणाचे धोरण आणि पुनर्वसनाची ग्वाही,केंद्र सरकारची रणनीती

 आत्मसमर्पणाचे धोरण आणि पुनर्वसनाची ग्वाही

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आत्मसमर्पण करणाऱ्यांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे. संविधानाचा आदर करेलत्याच्या जीवनात सकारात्मक बदल होईल असा संदेश आम्ही आत्मसमर्पितांच्या पुनर्वसनातून देऊआत्मसमर्पण केलेल्यांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्यात येईल. यापूर्वी आत्मसमर्पण केलेल्यांना येथील उद्योगांमध्ये प्रशिक्षण देऊन नोकरी देण्यात आली असूनभविष्यातही रोजगार देऊन पुनर्वसन करण्यात येईल. सर्व आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या पुनर्वसनासाठी एकत्रितपणे एकूण ३ कोटी १ लाख ५५ हजार रुपये देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारची रणनीती

मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून माओवादाविरुद्ध निश्चित करण्यात आलेल्या धोरणांचे आणि गृहमंत्री अमित शाह यांनी २०२६ पर्यंत माओवाद संपवण्यासाठी आखलेल्या रणनीतीचे कौतुक केले. या धोरणात आत्मसमर्पणातून मुख्य प्रवाहात सामील होणे किंवा पोलीस कारवाईला सामोरे जाणे हे दोनच पर्याय असल्यामुळे देशातून मोठ्या प्रमाणात माओवादाचे उच्चाटन होत असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi