Sunday, 19 October 2025

ऐतिहासिक आत्मसमर्पण आणि नवीन इतिहास

 ऐतिहासिक आत्मसमर्पण आणि नवीन इतिहास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की४० वर्षांपूर्वी अहेरीसिरोंचा या भागात नवीन दलम सुरू करून माओवाद पसरवणाऱ्या भूपतीसारख्या माओवादी नेत्याने आज ६१ साथीदारांसह सशस्र आत्मसमर्पण केले आहे. "ही देशाच्या इतिहासातील अत्यंत मोठी घटना आहे. आजच्या आत्मसमर्पणातून नवीन इतिहास लिहिला गेला आहे. यापूर्वी उत्तर गडचिरोलीतून माओवाद संपुष्टात आणण्यात आला आहेआणि आजच्या या आत्मसमर्पणामुळे दक्षिण गडचिरोलीतील माओवादही संपुष्टात आला आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अन्य माओवाद्यांनाही आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केलेअन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला.

समता केवळ संविधानातूनच

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दंडकारण्याच्या या भागातील लोकांनी माओवादाशी लढा दिला. माओवादामुळे हा भाग विकासापासून वंचित राहिला. 'पिपल्स वॉर ग्रुपद्वारे माओवादी सक्रिय झाले आणि त्यांनी येथील युवकांमध्ये व्यवस्थेविरुद्ध संभ्रम निर्माण केला. मात्र समता व न्याय फक्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातूनच येऊ शकते या वास्तविकतेची जाणीव झाल्याने माओवादी चळवळीच्या नादी लागलेले आता आत्मसर्पण करत आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi