क्रीडा मंत्री ॲड.कोकाटे म्हणाले की, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत हे धोरण पोहोचणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील तरुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी विशेष उपक्रमांचा समावेश करावा. महिला व बालविकास विभाग, सांस्कृतिक कार्य, कौशल्य विकास विभाग आदी विभागांच्या समन्वयातून युवकांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यावर भर देण्यात यावा.
राज्यातील सर्व तरुणांना धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात यावेत. युवकांचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य, मानसिक कल्याण, व्यसनाधीनता निर्मूलन, शिक्षण, रोजगार, उपजीविका, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर गुन्हेगारी प्रतिबंध, डिजिटल तंत्रज्ञान आदी महत्त्वाच्या बाबी युवा धोरणाचा भाग असाव्यात, असे निर्देशही ॲड. कोकाटे यांनी यावेळी दिले.
No comments:
Post a Comment